पवारांची ताकद- मोहितेंचे वलय- जगतापांचे बळ- सावंतांची खंबीर साथ या मिश्रणाच्या जोरावर नारायण पाटिल राजकीय आखाड्यात ठरले सरस ….
. . . . मात्र जयवंतराव ठरवतील तेच आमदार होतील हेच पुन्हा सिध्द
पवारांची ताकद- मोहितेंचे वलय- जगतापांचे बळ- सावंतांची खंबीर साथ या मिश्रणाच्या जोरावर नारायण पाटिल राजकीय आखाड्यात ठरले सरस ….
. . . . मात्र जयवंतराव ठरवतील तेच आमदार होतील हेच पुन्हा सिध्द
जिल्हा विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा : करमाळा विधानसभेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून,या निवडणुकीतून जगताप गटाने पुन्हा एकदा किंग मेकर बनण्याच बहुमान मिळविला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )यांचे अधिकृत उमेदवारी सुरूवातीपासूनच नक्की झालेले आम.नारायण पाटील यांच्या विक्रमी मताधिक्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. वास्तविक पहाता जयवंतराव जगताप व नारायण पाटील यांचा पुराणाच याराना असल्याने निवडणूक प्रचारात एक मोठा जोश,उत्साह,आत्मविश्वास दिसत होता. माजी आमदार जयवंतराव जगताप,शरदचंद्र पवार ,आमोल कोल्हे यांच्या जाहीर सभांना मिळालेला भरभरून प्रतिसाद जगताप-पाटील-सावंत गटाचा उत्साह वाढविणाऱ्या ठरल्या असुन,आमदार नारायण पाटील हे पुर्वाश्रमीचे जगताप गटाचेच असल्याने या दोन्ही शक्ती एकत्र असताना त्यांचा पराभव करणे विरोधी गटाला खुप कठीण जाते हा इतिहास आजही कायम आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वास्तविक करमाळा तालुक्याच्या आमदारकीचा इतिहास पहायचा झाल्यास 1952 सालापासून ते आज 2024 पर्यन्त झालेल्या निवडणुकीत माजी आमदार कै.रावसाहेब पाटील (1वेळा) माजी आमदार कै.दिगंबरराव बागल (दोन वेळा),माजी आमदार शामलताई बागल (1वेळा)आमदार नारायण पाटील शिवसेनेकडून (1वेळा)असे सोडले तर बाकी सर्व वर्ष आमदारकी ही जगताप गटाकडेच राहीलेली असल्याने तालुक्यात आज जेजे शासकीय कार्यालये,संस्था, बसस्थानक, कुटीर रूग्णालय,शिक्षण संस्था असतील म्हणजेच जे आजच्या पिढीसमोर विकास झालेले नाहीत आणि ज्या ज्या सुविधा विकास झालेले आहेत ते जगताप गटाच्याच खात्यात जाते म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही.
खासदार विजयसिंह मोहीते पाटील असतील,खासदार धैर्यशील मोहीते पाटील असतील,माजी आमदार संजयमामा शिंदे असतील,व आजचे आमदार नारायण पाटील असतील यांना निवडुन आणण्यात जगताप गटाची मोलाची साथ मिळाल्याने हे शक्य झाले असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहेत. याचाच अर्थ जगताप गट आजही राजकीय कुरुक्षेत्रावर आपले पाय भक्कमपणे रोवून उभा असल्याचेच हे द्योतक आहे अशीही चर्चा होत आहे.आज जरी वस्तादच्या भुमिकेत जगताप गट काम करत असला तरी पैलवानाला लंगोट लावायला शिकवायची अगर सांगायची गरज पडत नाही. उदाहरणार्थ पहावयाचे झाले तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांना कोणत्या परिस्थितीत व कोणत्या कारणामुळे साथ दिली होती व आज त्याना दिलेले जगताप गटाचे बळ काढुन पुन्हा नारायण पाटलांना दिले यातुन काय स्पष्ट होते हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची आवश्यकता नाही. म्हणुनच जयवंतराव जगताप ठरवतात तेच आमदार होतात हेच पुन्हा सिद्ध झाले आहे हे निश्चित!!
सावंत गटाने दिलेली खंबीर साथ ही नारायण पाटील यांच्या विजयात महत्वाची ठरली असुन,माजी आमदार संजयमामा शिंदे यांना निवडुन आणण्यात व आज नारायण पाटील यांना निवडुन आणण्यात सावंत गटाने बजावलेली भुमिका राजकीय इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे हे नक्कीच!!!