श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
प्रथम पारितोषिक सौ.सुचिता विजय कराळे- खेड (पुणे) यांनी पटकावले.

श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद
प्रथम पारितोषिक सौ.सुचिता विजय कराळे- खेड (पुणे) यांनी पटकावले. . .
अलिबाग प्रतिनिधी : राजेश बाष्टे
‘श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. सुशीला सखाराम पाटील याच्या पुण्यस्मरण निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यभरात सदर स्पर्धेचे कौतुक होत आहे.
श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड महाराष्ट्र च्या वतीने स्व.सुशीला पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त अँड.रत्नाकर पाटील यांनी आईची आठवण’ म्हणून स्व.आद्य नाईक स्मृती पुरस्कार’ राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.आईची आठवण म्हणून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत १) माझी आई,२) आई माझे दैवत,३) आई विना घर खाली. हे तीन विषय ठेवण्यात आले होते.सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून २५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. आलेल्या सर्व स्पर्धकांमधून १० स्पर्धक निवडण्यात आले. त्यामध्ये प्रथम पारितोषिक सौ.सुचिता विजय कराळे- खेड (पुणे) यांनी पटकावले. (रोख रक्कम ३३३३ रुपये , स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र), द्वितीय पारितोषिक संध्या यादवाडकर- मुंबई (रोख रक्कम २२२२ रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र), तृतीय पारितोषिक अचला धारप-रोहा (रायगड),( रोख रक्कम ११११ रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र), चतुर्थ पारितोषिक अनुकूल माळी-ठाणे (रोख रक्कम ७७७ रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र), तर पाचवे पारितोषिक नंदू तळकर- अलिबाग (रायगड) (रोख रक्कम ७७७ रुपये ,स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र) देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके १) चंद्रकांत घाडगे-सातारा, २) मंगेश म्हात्रे-भिवंडी (ठाणे),३) सुभाष ठाकूर-ठाणे,४) राही लिमये-पुणे,५) प्रवीण म्हात्रे- पनवेल (रायगड) यांनी पटकावले. यांना प्रत्येकी ५५५ रू. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण स्पर्धा आयोजनाची जबाबदारी ठाणे खिडकाळी येथील साहित्यिक नवनाथ ठाकूर यांनी सांभाळली,तर २५८ कविता चे परिक्षण जेष्ठ साहित्यिका सौ. अर्चना सहस्त्रबुद्धे-पुणे यांनी केले.
स्पर्धा प्रमुख अँड.रत्नाकर पाटील व आयोजक नवनाथ ठाकूर यांनी हा निकाल जाहीर केल्या नंतर सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
राज्यभरात सदर स्पर्धेचे कौतुक व विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.