गल्लीबोळात, रिकाम्या जागेचा आडोसा घेऊन थंडीत कुडकुडणाऱ्यांना मिळाले उबदार ब्लँकेट
स्नेहबंध फाउंडेशनचा उपक्रम, शहरातील विविध भागात वाटप केले ५५ ब्लँकेट
गल्लीबोळात, रिकाम्या जागेचा आडोसा घेऊन थंडीत कुडकुडणाऱ्यांना मिळाले उबदार ब्लँकेट
स्नेहबंध फाउंडेशनचा उपक्रम, शहरातील विविध भागात वाटप केले ५५ ब्लँकेट
अहिल्यानगर : शहरातील गल्लीबोळात, रिकाम्या जागेचा आडोसा घेऊन रात्री थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब, बेघर, गरजुंना ५५ उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे व स्वयंसेवकांनी शहरात फिरून राबवला. शहरात अनेक बेघर, निराधार दिवसभर पोटासाठी भटकंती करतात. आणि रात्री निवाऱ्यासाठी मंदिर परिसर, बसस्थानकाचा आश्रय घेतात. रोजीरोटीसाठी घर सोडलेले, डोक्यावर हक्काचे छप्पर नसणारे आणि थंडीत कुडकुडणाऱ्या माणसांसाठी काहीतरी करायचे, या भावनेतून स्नेहबंध फाउंडेशन हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून राबवत आहे. शहरातील सावेडी, माळीवाडा, नालेगाव, आनंदधाम, स्वस्तिक चौक, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट यार्ड परिसर आदी ठिकाणी रस्त्यांवर, फूटपाथवर झोपेत कुडकुडणाऱ्या गरिब, गरजूंना ब्लँकेट दिले. यावेळी डॉ. उद्धव शिंदे, सचिन पेंडूरकर, अंकुश तरवडे, निशांत पानसरे, निखिल नरवणे उपस्थित होते.
रात्री सहा तास वाटप केले ब्लँकेट
शहरातील गरजूंचा शोध घेऊन त्यांची संख्या निश्चित केली. यानंतर रविवारी रात्री १० वाजेपासून सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत शहरातील मंदिर परिसर, बसस्थानक व रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून त्यांचे थंडीपासून संरक्षण केले. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर स्नेहबंधकडे देत असलेल्या ब्लँकेटचा गरिबांसाठी उपयोग होत आहे ही एक परमेश्वर सेवाच आहे, या उपक्रमाला प्रकाश गांधी याचे सहकार्य मिळाले, असे डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले .