अमिषाला बळी न पडता संघर्ष करणा-या हर्षदाताई काकडे यांना निवडून द्या…- अॅड. शिवाजीराव काकडे
अमिषाला बळी न पडता संघर्ष करणा-या हर्षदाताई काकडे यांना निवडून द्या…- अॅड. शिवाजीराव काकडे
प्रतिनिधी : आसावरी वायकर
पाथर्डी – शेवगाव – पाथर्डीची लढाई ही श्रीमंत विरूद्ध गरीब अशी आहे. मला आजारपणातून बरे होण्यासाठी सर्व जाती धर्मांच्या लोकांनी प्रार्थना केल्या. मी तुमच्या लेकरा बाळांच्या विकासासाठी ३० वर्षांपासून संघर्ष करीत आहे. प्रचार सांगता सभेला मी जर आलो नसतो तर माझा श्वास कोंडला असता. या मतदार संघात सुप्त लाट आहे. अनेकांचे फोन येत आहे. शेवगावचे अपक्ष कारखानदारांना मते देऊन वाया घालवू नका. कार्यसम्राट असा प्रचार करणा-या विद्यमान आमदारांचा मतदार संघात अंधार पसरला आहे. निवडणुकीचा निर्णायक क्षण आला आहे आता ही मोठी संधी आहे असून तुमच्या लेकरा बाळांच्या विकासासाठी मला इश्वराने पुन्हा जनतेत पाठविले आहे. पुढील तीन दिवसांत कितीही अमिषे येतील, पण त्याला बळी पडू नका, मतदार संघात एमआयडीसी आणून आपण तरूणांना रोजगार देण्यासाठी नवीन चेहरा असणा-या संघर्ष करणा-या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या रिक्षा चिन्हा समोर बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन जनशक्ती विकास आघाडीचे अॅड. शिवाजीराव काकडे यांनी पाथर्डी येथील सांगता सभेत केले.
जनतेच्या उमेदवार म्हणून प्रसिद्ध झालेल्या अपक्ष उमेदवार सौ. हर्षदाताई काकडे याच्या प्रचारार्थ आजारपणानंतर १५ दिवसानंतर अॅड. काकडे हे पहिल्यांदाच सामिल झाले. त्यांनी विरोधकांच्या वर खरमरीत टिका करीत हर्षदाताई काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सौ. हर्षदाताई काकडे, संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ, कविवर्य अंकुश आरेकर आदींच्या उपस्थित शहरातून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सांगता सभेत अॅड. काकडे बोलत होते.
या वेळी बोलताना सौ. काकडे म्हणाले, लोकांना विचारून मी व अॅड. काकडे साहेब यांनी मी विधानसभेसाठी निवडणूक लढवीत आहे. मिडीयात माझा आवाज साखर सम्राटांनी दाबून ठेवला पण जनतेचा आवाज कोणीही दाबून ठेऊ शकत नाही. चरकात घातल्याप्रमाणे शेतक-यांचे चिपाड केले आहे. जानेवारीत ऊस घातला त्याचेही पेमेंट कारखानदारा-यांनी केले नाही. ज्ञानेश्वर साखर कारखान्याने ३०० रूपयांप्रमाणे टनापमाणे काढून पेमेंट कपात केले. वृद्धेश्वरने १२६ रूपये कपात केले. अॅड. साहेबांवर मोठा प्रसंग आला. मधल्या प्रसंगाच्या काळात काही माणसे अशी पाठवली की अॅड. काकडे यांना काही लोक म्हणाले की तुम्ही नाटक करता, त्यांच्या पिल्लांनी असे का करावे. या निवडणूकीत परमेश्वराने चांगली वेळ दिली आहे. कॉ. आबासाहेबांनी काम केले तेच आम्ही चालू ठेवले आहे. शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणून त्यांना दिशा द्यायची आहे. रस्त्यांची , वीजांची व पाण्याच्या कामात हे लोक धनदांडगे झाले आहे. या वेळी सचिन घायाळ यांनीही तिनही साखर सम्राटांविरोधात खरमरीत टिका केली.
चौकट – शेवगाव – पाथर्डीत विकास हरवला आहे. नौंटकी करणारी माणसे लोकांना माणसे समजली आहेत. हर्षदाताई काकडे यांचे सर्वत्र स्वागत झाले. पण, निवडणुकीत हॅलीकॉप्टर एकदाच येते. नंतर गायब होते. आबासाहेब काकडे हे फक्त अवघ्या ६०० मतांनी पडले. बाळासाहेब भारदे पुन्हा मतदार संघात आले नाहीत. माणिक दौंडीतील परिसरातील अनेकांना आजही पश्चाताप येतो. ऊस तोडणी मुलांच्या कामगारांना आता कोयता घासण्याची वेळ येणार नाही. त्यांना आपण शिक्षण देऊन त्यांचा विकास करू. घुलेंचे शेवगाव तालुक्यात काहीच राहिले नाही. खुप झाली शिक्षा आता फक्त रिक्षा हे शेवगावकरांनी ठरविले आहे. पाथर्डीतही महिला , व्यापारी , सर्वसामान्य सुरक्षित नाहित, विद्यमान आमदार फक्त हप्ते गोळा करीत आहेत. मी वचननामा दिला आहे. हे काकडेंनी दिलेले वचन सर्वसामान्यांनी दिलेले आहे. जे वचन दिले ते मी पु्ण करणारच. शेवगाव पाथर्डीतील गावांना मुबलक पाणी नाही. गेवराईला पाणी जाते. पण शेवगाव पाथर्डीच्या २१८ गावांना का नाही पाणी दिले. ताजनापूर लिफ्ट मंजूर करण्यात घुले बंधू खोटारडेपणा करीत आहेत. शेतीसाठी पाणी द्यायचे. कोपरे धरण ज्या राजळे घराण्यांनी रद्द केले. त्यांना सत्ता दिली. मुळा धरणात आजही दोन टिएमसी पाणी आजही शिल्लक आहे. काकडेंनी दिलेले वचन आम्ही नक्की पाळू.