नगर जवळील गोरक्षनाथ गडावर प्रकटदिन उत्साहात संपन्न
नगर जवळील गोरक्षनाथ गडावर प्रकटदिन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल
अहिल्यानगर : धार्मिक महत्व असलेल्या नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथ प्रकटदिन उत्साहात संपन्न झाला.त्यानिंमताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष ऍड शंकरराव कदम यांनी दिली .
सकाळी महापूजा व अभिषेक नाथभक्त दांपत्याच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे,शास्त्री, लोणीकर यांचे कीर्तन झाले यावेळी अध्यक्ष ऍड शंकरराव कदम, गोरक्षनाथ कदम,जयराम कदम,मारुती कदम,सरपंच जालिंदर कदम व विश्वस्त मंडळ,मांजरसुंभा ग्रामस्थ यांच्यासह मोठ्या संख्नेने भाविक,नाथभक्त उपस्थित होते तर दुपारी १२ ते ३ यावेळेत रामदास पठारे,दत्तात्रय भुतकर व नाथ भक्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.पहाटेपासून दिवसभर मोठ्या संख्नेने भाविक दर्शनासाठी आले होते. तर दिवशभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या .
गोरक्षनाथ महाराज देठे यावेळी म्हणाले मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांने त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशिर्वाद दिला. मुलगा होईल. सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली.त्या शेणातून मुलगा प्रगटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले. तेच गोरक्षनाथ.गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे. कानाला छिद्र पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली.
गोरखनाथगड स्थानाबाबत नवनाथ भक्तिसार मध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे स्त्री राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथानी सोन्याची वीट बरोबर आणली होती ती मांजरसुंभा या ठिकाणी ऋषी,मुनी,देव आदिसाठी भंडारा करण्यासाठी पण ती गोरक्षनाथानी फेकून दिली तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले.गुरूला शांत करण्यासाठी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला व गुरूची इच्छापूर्ती साठी सर्वाना निमंत्रण देऊन या ठिकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात महायन्य केला करून अन्नदान केले अशी पौराणिक कथा आहे असेही देठे महाराज म्हणाले .
वर्षभर भाविक व पर्यटक या ठिकाणी रोज येत असतात.येथील स्मृतीमंदिराचे काम पूर्ण झाले आहे
फोटो-नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर प्रकट दिना निम्मित सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात यावेळी गोरक्षनाथ महाराज देठे ,अध्यक्ष ऍड शंकरराव कदम, गोरक्षनाथ कदम,जयराम कदम,मारुती कदम,सरपंच जालिंदर कदम व विश्वस्त मंडळ उपस्थित होते