Breaking
ब्रेकिंग

प्रचारासाठी 28 दिवसांत जनतेने दिलेला मतरूपी आशिर्वाद हीच माझी प्रेरणा–दिग्विजय बागल

0 3 9 0 3 0

प्रचारासाठी 28 दिवसांत जनतेने दिलेला मतरूपी आशिर्वाद हीच माझी प्रेरणा–दिग्विजय बागल

विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी 

करमाळा तालुक्यातील जनतेने मतरुपी आशीर्वाद देऊन महायुतीच्या माध्यमातून आपणास भरभरून मते दिली आहेत. जनतेचे हे प्रेम, ऋण आपण कायम मनात ठेवून जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन निरंतर सेवेत राहणार असल्याचे, शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक विलासराव घुमरे,मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर ,आदिनाथ चे माजी व्हा. चेअरमन रमेश कांबळे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, मकाईचे संचालक रामभाऊ हाके, सतीश निळ, बाळासाहेब अनारसे, सुनील लोखंडे, राहुल जगताप, बाळासाहेब क्षीरसागर, रंगनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या युवकाला शिवसेनेचे तिकीट देऊन उमेदवारी दिली, 28 दिवसाचा कालखंड असतानाही, शिवसेना, भाजप, घटक मित्र पक्षांनी रात्रंदिवस प्रचार यंत्रणा राबवून माझ्यासाठी काम केले. जनतेनेही मला भरभरून प्रेम दिले. रश्मी बागल यांच्या 2019 च्या पराभवानंतर मागील साडेचार वर्षात जनसंपर्क नसताना, आम्ही राजकारणामध्ये पूर्णतः आमची मानसिक बॅकफुटावर गेली होती. मात्र गेल्या सहा महिन्यातच मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनातून, लोकसभेला भाजपमध्ये रश्मी दिदींचा प्रवेश, तसेच शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे पाठबळ मिळाल्यामुळे, तसेच स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांचा मुलगा म्हणून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आम्ही तालुक्यामध्ये जनतेच्या विश्वासास पात्र ठरलो आहे. जरी पराभव झाला असला, तरी राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून, देशामध्ये आपलेच सरकार असल्याने, विकास कामाचे कुठलीही काम आपल्या सरकारच्या सहकार्यातूनच होणार आहे, असेही बागल यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शक विलासराव घोपरे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सुशिक्षित मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, जनसंपर्काच्या बाबत कमी कालावधी मिळाला असला तरी जनतेने नव्याने उभा राहिलेल्या दिग्विजय बागल यांना, स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांचा मुलगा, शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून चांगली मते दिली आहेत. त्यामुळे आमचे लक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आदिनाथ कारखाना, मकाई कारखाना, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका असून, पक्षाच्या माध्यमातून निवडणुका जिंकून पक्ष मजबूती बरोबर जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे