कापूस महामंडळाने केली अमळनेरच्या शेतकऱ्यांची थट्टा !
माणसांची कमतरता आणि कापूस खराब असल्याचा विचित्र अहवाल
कापूस महामंडळाने केली अमळनेरच्या .शेतकऱ्यांची थट्टा !
माणसांची कमतरता आणि कापूस खराब असल्याचा विचित्र अहवाल
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी कापूस महामंडळाने असमर्थता दर्शवल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू होणार …सुरू होणार .या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी बाजार समिती संचालक , सभापती , आमदार अनिल पाटील , खासदार स्मिता वाघ यांनी प्रयत्न केले होते. मात्र या साऱ्यांच्या प्रयत्नाला अद्याप यश आले नाही. महामंडळाचे अधिकारी खो वर खो देत आहेत.
अमळनेर तालुक्यात बाजार समितीचे प्रतिनिधी डिगंबर पाटील यांच्यासोबत काही शेतकऱ्यांच्या घरी कापसाची गुणवत्ता पाहिली गेली काही ठिकाणी कापूस चांगला होता. काही ठिकाणी खराब होता. त्यामुळे संमिश्र कापूस येण्याची शक्यता होती. तसेच काही ठिकाणी जिनिंग देखील तपासण्यात आल्या. त्यात लक्ष्मी जिनिंग मध्ये खरेदी होत असलेल्या कापसाची गुणवत्ता खराब होती. अमळनेरच्या केंद्रातील कापूस पिवळा , कोंडी आणि पत्ते दिसत आहेत. याभागात पाऊस अधिक झाल्याने त्यामुळे कापूस खराब झाला आहे असा अहवाल पाठवण्यात आला आहे.
काही भागात कापूस चांगला होता ही कबुली कापूस महामंडळाचे वाणिज्य अधिकारी इंद्रप्रकाश लाटा यांनी पत्रात दिली आहे. तर काही ठिकाणी कापूस खराब होता , मिक्स कापूस येण्याची शक्यता वर्तवली आहे. इंद्र प्रकाश यांनी संपूर्ण भारतातील असे एक गाव सांगावे की तेथे एकाच प्रतीचा कापूस येतो. आणि खराब कापूस येतच नाही. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी भाव नसल्याने कापूस साठवून ठेवला आहे. तो पिवळा पडणारच ! कापसाची गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रेडर असतात त्यामुळे त्यानुसार कापसाला भाव द्यावा लागतो. मग खराब कापसाचे कारण काय? हीच परिस्थिती आजूबाजूच्या तालुक्यात देखील असताना तेथे कापूस खरेदी केंद्र कसे सुरू झाले ? त्यामुळे कापूस महामंडळ अमळनेर तालुक्याला सावत्र वागणूक देत आहे.
इंद्रप्रकाश यांनी अमळनेर येथील लक्ष्मी जीन मध्ये खराब कापूस घेतला जात होता असे अहवालात नमूद केले आहे. शासकीय खरेदी नसताना जीन मालक शेतकऱ्यांचा कसाही कापूस घेऊ शकतो मग लक्ष्मी जीन बद्दल बदनामी का ? कापूस महामंडळाकडे सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मनुष्य बळ नाही तरी ते दोनदा तीनदा पाहणीचे नाटक करून विचित्र अहवाल देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी विविध कंपन्यांचे व विविध जातींचे कापूस वाण लावत असल्याने कापूस चांगला खराब असे उत्पन्न येणारच आहे. कापूस महामंडळाने फक्त यंत्रणा आणि आवक तपासली पाहिजे होती. आजूबाजूच्या तालुक्यात हीच परिस्थिती असतांना कापूस मंडळाने असेच अहवाल पाठवले का हे देखील तपासण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी आता तालुक्याची अस्मिता जागे करून अन्याय दूर करावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.