अमळनेर शहरात चोरट्यांनी केली मोठी घरफोडी
घरफोडीच्या घटनेने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण

अमळनेर शहरात चोरट्यांनी केली मोठी घरफोडी
घरफोडीच्या घटनेने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर: -अमळनेर शहरातील भर वस्तीत राहणारे दोन सख्खे भाऊ.हज यात्रेला जाण्यासाठी आपल्या भावाला सोडायला गेले होते.भरवस्तीतील दोन्ही भावांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून मोठी घरफोडी केली आहे.
हि घटनी २१ मे रोजी झाली आहे.ही घटना घडल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.भावाला सोडुन परत आल्यावर घराचे कुलूप तुडलेले दिसले व तसेच घरातील साहित्य फेकलेले आढळलेले दिसले.तसेच आपल्या भावातील घरातील कपाट्यातील साहित्य सुद्धा फेकलेले होते.त्यांचा मुलगा देखील घरी नव्हता तो बाहेर गावी गेलेला होता.
पोलिसांना ही घटना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील , मिलिंद सोनार ,अमोल पाटील , विनोद , निलेश मोरे , जितेंद्र निकुंभे यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तातडीने ठसे तज्ञ व श्वान पथक बोलावण्यात आले. श्वान पथकाला चोरट्यांचा मार्ग सापडला नाही. मात्र ठसे तज्ज्ञांनी वस्तूंवरचे ठसे नमुने घेतले आहेत. घरमालकांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा माल चोरीस गेल्याचे सांगितले असले तरी नेमकी कितीची चोरी झाली हे निश्चित सांगता येत नव्हते. त्यामुळे एक भाऊ मुंबईहून परत आल्यानन्तर पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून चोरीचा तपास सुरू केला आहे.