२७ एप्रिल जैन शासन स्थापना दिवस
२७ एप्रिल जैन शासन स्थापना दिवस
जैन शासन स्थापना दिवस हा जैन धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे, जो भगवान महावीरांनी साधारण २५८० वर्षांपूर्वी सुरू करून चतुर्विध संघाची स्थापना केली त्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. जैन शासन स्थापना दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे . भगवान महावीरांना वैशाख शुक्ल दशमीला केवळज्ञान प्राप्त झाले होते आणि त्यानंतर वैशाख शुक्ल एकादशीला पावापुरी येथे त्यांनी साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका (चतुर्विध संघ) अशा जैन संघाची स्थापना केली.
हा दिवस वैशाख शुक्ल एकादशीला साजरा केला जातो, जो साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात येतो.
हा दिवस साजरे करण्याचे विशेष महत्व आहे . या दिवशी जैन श्रावक- श्राविकांच्या वतीने जैन ध्वज (पाच रंगांचा ध्वज ) फडकवला जातो.
साधू-साध्वींच्या उपस्थितीत शोभायात्रा किंवा मिरवणुका काढल्या जातात. भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि विशेष प्रवचनांचे आयोजन केले जाते.महावीरांच्या अहिंसा, अपरिग्रह, आणि अनेकांतवादाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो.
उद्देश: भगवान महावीरांनी दिलेली मानवतेची देणगी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचे स्मरण करणे आणि समाजाला संघटित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी जैन धर्मावलंबी आपापल्या घरांवर आणि मंदिरांवर जैन ध्वज लावून हा दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.


