आर.सी.एफ.कंपनीच्या कुरूळ कॉलनी येथून नागरिकांच्या* *जाण्यायेण्यावर केलेली बंदी उठवा – – कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस* *अॅड.प्रविण मधुकर ठाकूर यांची आर.सी.एफ.कडे मागणी*
आर.सी एफ कडून लवकरात लवकर सुरक्षीततेचे निकष पाळून मार्ग काढण्याचे आश्वासन.*

*आर.सी.एफ.कंपनीच्या कुरूळ कॉलनी येथून नागरिकांच्या* *जाण्यायेण्यावर केलेली बंदी उठवा – – कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस* *अॅड.प्रविण मधुकर ठाकूर यांची आर.सी.एफ.कडे मागणी*
*आर.सी एफ कडून लवकरात लवकर सुरक्षीततेचे निकष पाळून मार्ग काढण्याचे आश्वासन.*
*अलिबाग प्रतिनिधी राजेश बाष्टे:-
आर.सी.एफ.कंपनीच्या कुरूळ कॉलनी येथून नागरिकांच्या जाण्यायेण्यावर केलेली बंदी उठवा अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी आर.सी.एफ.प्रशासनाला ईमेल पाठवून केली आहे. आर.सी.एफ.प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही सुरू असून जेष्ठ नागरिक, व सध्याची सामाजिक परिस्थतीती, तसेच कंपनीच्या कॉलनीची सुरक्षीतता याचा विचार करून लवकरात लवकर यामधून मार्ग काढून नागरिकांची अडचण दुर करण्यात येईल असे आर.सी.एफ.व्दारे सांगण्यांत आले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी कार्यकारी संचालक आर.सी.एफ.थळ यांना लिहीलेल्या पत्रात आर.सी.एफ.कंपनीच्या कुरूळ कॉलनी येथे गेली अनेक वर्षे स्थानिक नागरिक येजा करीत आहेत. काही नागरीक सकाळी चालण्यासाठी अथवा योगासने करण्यासाठी कॉलनीमध्ये काही काळासाठी जात असतात. आरोग्यदायक व्यायामासाठी काही जेष्ठ नागरिक ज्यामध्ये निवृत्त सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकांचाही समावेश असतो.
गेली अनेक वर्षे आरसीएफ कुरूळ कॉलनी येथून कुरूळ, वेश्वी, चेंढरे येथील शाळा, कॉलेज मधील विदयार्थी व नागरिक येथून ये जा करीत आहेत. सुरक्षीत व सोयीचा मार्ग तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व जेष्ठ नागरिक यांना चालण्याच्या व्यायामासाठी सकाळी व संध्याकाळी काही काळ या मार्गाचा वापर केला जातो.
सुरक्षित मार्ग किंवा ठिकाण म्हणून नागरिक याकडे पहात असतात. आरसीफए ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीसाठी येथील लोकांनी जमिनी दिल्यानेच हा प्रकल्प आज सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे येथील लोकांचा देखील फायदा झाला असून येथील विकासामध्ये आर.सी.एफ.चा मोलाचा वाटा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणांवरून हा मार्ग सर्व सामान्य लोकांसाठी बंद करण्यांत आला आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे.
आर.सी.एफ.ने कंपनीने लवकरात लवकर लोकांसांठी कॉलनीमधील प्रवेश चालू करावा अशी मागणी अॅड.प्रविण ठाकूर यांनी केली आहे.