Breaking
ब्रेकिंग

नवसह्याद्रीच्या संदीप पांगारे यांना ‘बेस्ट एम्पलोयी अवॉर्ड २०२४-२५’ जाहीर

0 3 9 0 2 3

नवसह्याद्रीच्या संदीप पांगारे यांना ‘बेस्ट एम्पलोयी अवॉर्ड २०२४-२५’ जाहीर

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक शैक्षणिक संस्था म्हणजे भोर,पुणे येथील नवसह्याद्री . शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालखंडात शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिझल्ट,रिसर्च, ऍडमिशन, प्लेसमेंट तसेच सांस्कृतिक विकासात अग्रगण्य कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके व ग्रुप डायरेक्टर सागरजी सुके सर यांच्या संकल्पनेतून देण्यात येणारा ‘बेस्ट एम्पलोयी अवॉर्ड’ २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देण्यात आला.

नव सह्याद्री शैक्षणिक संकुलातील इंजीनियरिंग फार्मसी पॉलिटेक्निक व मॅनेजमेंट या विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा अवॉर्ड दिला जातो. कालच पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ .सुहास पाखरे,डॉ. लक्ष्मण डोईफोडे ,डॉ. सुनील खिलारी, प्रा.शेखर मोरे ,डॉ. मेहता, डॉ. काशीद, प्रा.कदम प्रा. प्रभाकर शिवथरे प्रा. इंद्रनील मुखर्जी, राजेंद्रजी संकपाळ,संदीपजी पांगारे योगेशजी सरपाळे ,ओंकारजी देशमुख ,प्रा.समाधान भोसले, प्रा.सुनील झांबरे, प्रा.स्नेहल जिरंगे, प्रा.सी.डी देशमुख यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके, ग्रुप डायरेक्टर सागर जी सुके, विश्वस्त सौ.सुनंदाताई सुके, विश्वस्त नानासाहेब सुके , संस्था उपाध्यक्षा सौ.सायली सुके, संचालिका सौ .सानवी सुके ,कॅम्पस डायरेक्टर डॉ. तानाजी दबडे ,फार्मसी प्राचार्य डॉ.ओतारी ,इंजीनियरिंग प्राचार्य डॉ.अमोल लोखंडे, पॉलिटेक्निक प्राचार्य प्रा. पंकज भोकरे ,गुरुकुल प्राचार्या सौ. धुमाळ व प्रशासक अनिलजी वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी सर्व प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संस्थापक अध्यक्ष पोपटराव जी सुके म्हणाले, दरवर्षी आपल्या संस्थेचे विकासामध्ये भर पडत आहे. येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या कालखंडात आपली संस्था एका उच्च स्तरावर नेण्यासाठी सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रीसर्च प्रेसेंटेशन्स ,स्पर्धात्मक कॉम्पिटिशन ,रिझल्ट ,सांस्कृतिक विकास यावर भर देऊन स्वायत्तेकडे जाण्याचा संकल्प मांडला. हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ.सुहास पाखरे व श्री. संदीपजी पांगरे यांनी संस्थेचे आभार मानले . तसेच तन-मन धनाने संस्थेच्या विकासात कायमच हातभार लावण्याची हमी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राम घुगे यांनी केले. तसेच नवस्या दिशेषण संकुलातील प्राध्यापक सागर जी खुटवड यांचाही अभिष्टचिंतन सोहळा पार पाडण्यात आला. खऱ्या अर्थाने दरवर्षी नवसह्याद्री मध्ये २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक, गुणवंत कर्मचारी गुणगौरव व अभिष्टचिंतन यांचा त्रिवेरी संगम साधला जातो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे