आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्या होणाऱ्या निवडणुका या मोठ्या ताकतीने लढवून जिंकायच्या – प्रदीप गारटकर
नवनियुक्त आमदारांनी व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे - प्रदीप गारटकर.
आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्या होणाऱ्या निवडणुका या मोठ्या ताकतीने लढवून जिंकायच्या – प्रदीप गारटकर
नवनियुक्त आमदारांनी व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी
आपल्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे – प्रदीप गारटकर
इंदापूर / प्रतिनिधी
इंदापूर : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने नवनियुक्त आमदारांचा सत्कार समारंभ पुणे येथील शिवस्मारक सभागृह धनकवडी पुणे येथे (दि. ३०)पार पडला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर बोलताना म्हणाले की, आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार यांनी राजकीय दृष्ट्या ही महाराष्ट्रात स्वतः चे स्थान निर्माण केले आहे.स्वतःच्या ताकतीवरती ४१ आमदार निवडून आणल्याने वेगळ्या पद्धतीची ताकद राजकारणामध्ये त्यांची निर्माण झाली असून आजवरच्या ३० ते ४० वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही पाहिलेली ही राजकीय वेळ ही आपल्या पक्षाच्या दृष्टीने अजितदादांच्या नेतृत्वाच्या दृष्टीने आपल्या पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने हा अत्यंत परिपक्व असा काळ आहे. केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार असून राज्यामध्ये संपूर्ण बहुमतामध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा तिन्ही पक्षांना पूर्ण बहुमताने सत्ता मिळालेले आहे. हा पुणे जिल्हा संपूर्ण जगामध्ये अत्यंत नावाजलेला जिल्हा व प्रगतीचा जिल्हा म्हणून मानला जातो. या जिल्हाचे सर्वात जास्त काळ पालकमंत्री म्हणून अजित पवारच कार्यरत होते व आहेत त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांचे विशेष लक्ष असते. आज असलेल्या या राजकीय पाठबळाचा फायदा नवनियुक्त आमदारांनी व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या संकल्पनेतून आपापल्या तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास कसा होईल याकडे लक्ष देऊन आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून प्रशासन व राज्यकर्ते यांनी हातात हात घालून आपल्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. बारामती, इंदापूर, जुन्नर आणि आंबेगाव हे चार तालुके वगळता पुणे शहराचा वाढता विकासाचा प्रभाव हा ग्रामीण भागातील इतर सर्व तालुक्यांवरती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसराचा वाढता विकास याच्यावरती अजितदादांचे असलेले विशेष लक्ष यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व नवनियुक्त आमदारांनी स्वतः चे अस्तित्व बळकट करण्याकरिता विशेष लक्ष न देता पक्ष संघटनेच्या पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन विकासाचं राजकारण करून इथून पुढच्या काळामध्ये हा जिल्हा संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर व प्रगतिशील जिल्हा म्हणून नावारूपाला कसा येईल अशा दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. याचं अनुषंगाने आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्या होणाऱ्या निवडणुका या मोठ्या ताकतीने लढवून या जागा जिंकायच्या आहेत. आपल्या पक्ष संघटनेचे बळ वाढवून आपले नेते अजितदादा पवार यांचा असलेला हा पुणे जिल्हा याचा बहुमान संपूर्ण महाराष्ट्रभर कसा वाढेल याकरिता प्रयत्नशील राहून अजितदादांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प आपल्या तालुक्यातील भागामध्ये कसे उभारता येतील. वेगवेगळे विकासाची काम कशी करता येतील. याचा अभ्यास पाच वर्ष नवनियुक्त आमदारांनी करावा व तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची टीम ही वेगळी कार्यरत ठेवावी.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकरिता इंदापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दत्तात्रय भरणे, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर ,शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार माऊली कटके, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर,माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दराडे, उपाध्यक्ष .सुनिल चांदेरे इ प्रमुखांनी मार्गदर्शन केले व नवनियुक्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी त्यांना विधानसभा निवडणुक २००२४ मध्ये उमेदवारी देऊन निवडणुकीत विजयी होण्याकरिता पक्ष संघटनेने महत्वाचे योगदान दिल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष सूनील तटकरे तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे आभार मानले .
बूथ कमिट्या मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय जिल्ह्यामध्ये कसा सुकर यासाठी प्रयत्न करा – प्रदीप गारटकर.
ज्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांनी बूथ कमिटी वरती लक्ष केंद्रित करून आपापल्या भागातील बूथ कमिट्या मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये कसा सुकर होईल याकरिता आपण प्रयत्न करायचा आहे.