राहुरीच्या सभासद कामगारांनी योग्य पॅनलला मतदान करावे-सुरेशराव लांबे पाटील

राहुरीच्या सभासद कामगारांनी योग्य पॅनलला मतदान करावे-सुरेशराव लांबे पाटील
राहुरी तालुका जावेद शेख
संपूर्ण महाराष्ट्रात भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेला डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना प्रस्थापितांच्या बेजबाबदार पणामुळे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असताना त्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याऐवजी मोठ्या दिमाखात सुरू आहे,कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असलेला राहुरी सहकारी साखर कारखाना व इतर सलग्न संस्था ताब्यात घेण्यासाठी तीन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत,या कारखान्याचे वाटोळे करणारेच नेते व अनेक उमेदवार पुन्हा निवडणुकीसाठी उभे आहेत मतदारांनी जरा आत्मपरीक्षण करून या कारखान्याचे ज्यांनी ज्यांनी वाटोळे केले अशांनव पुन्हा विश्वास न ठेवता योग्य पॅनलला मतदान करावे असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केले.
पुढे बोलताना शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील म्हणाले राहुरी सहकारी साखर कारखान्याचे अस्तित्व कायम राहावे यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांनी भरपूर प्रयत्न केले,परंतु भ्रष्टाचाराचे व्यसन लागलेल्या ह्या सत्ताधाऱ्यासह विरोधक सर्वच प्रस्थापित पुढा-यांनी कारखाना सभासद व कामगारांचे हित न बघता प्रत्येक वेळी सत्तेचा गैरवापर करून स्वार्थाचे राजकारण करून कारखान्याची मालमत्ता बँकेच्या कर्जाच्या नावाखाली नाममात्र रकमेत निलाव करून स्वताच गिळंकृत केली व कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिले,असा आरोप सर्वच प्रस्थापित पुढाऱ्यांवर करून ऊस उत्पादक शेतकरी मतदार व कामगारांनी योग्य पॅनललाच मतदान करावे असे आव्हान शेतकरी नेते सुरेशराव पाटील यांनी केले,