वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मंगळग्रह मंदिरात कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकाराविरोधात सामूहिक शपथविधी संपन्न

*वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मंगळग्रह मंदिरात कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकाराविरोधात सामूहिक शपथविधी संपन्न
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर ता. विवाह सोहळ्यांमध्ये तसेच कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकाराविरोधात
वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत येथील मंगळग्रह मंदिरात आलेल्या हजारो भाविकांनी सामूहिक शपथ घेतली.केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपरिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आडफाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होताना दिसून येत आहे. हे अनुचित प्रकार कुठेतरी थांबले जावेत, या हेतूने मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून आज सकाळी अकराला श्री मंगळ ग्रह मंदिरात हजारो भाविकांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर
अमळनेर भाविकांना सामुदायिक शपथ देताना साहेबराव पाटील, जयश्री पाटील, नितीनकुमार मुंडावरे, विनायक कोते, डॉ. डिगंबर महाले आदी.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, निवृत्त तहसीलदार आर. जी. चव्हाण, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा अध्यक्ष करणसिंग राजपूत यांच्यासह अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, अॅड. भय्यासाहेब मगर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापुढे मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना कायमस्वरूपी ही शपथ दिली जाणार आहे. अशा प्रकारचे पुरोगामी तथा क्रांतिकारी पाऊल उचलणारे श्री मंगळ ग्रह मंदिर हे देशातील पहिलेच मंदिर ठरले आहे. यापूर्वीही वस्त्र संहितेचा एल्गार याच मंदिराने सर्वप्रथम पुकारला होता.
प्लास्टिक विरोधही शपथ अमळनेर नगरपरिषद, मंगळ ग्रह सेवा संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव यांच्या विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे’ हे पथनाट्ये सादर करण्यात आले. प्रदूषण रोखण्यासह वसुंधरेचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि प्लास्टिक विरोधातही सामूहिक शपथ घेण्यात आली. यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, उज्ज्वला शाह, विलास कुलकर्णी, पुचंद ढाके, बाळा पवार, ऋत्विक भामरे आदींचे सहकार्य लाभले.