भाजपा किसान मोर्चा ची राज्यस्तरीय संघटन पर्व सभासद नोंदणी कार्यशाळा संभाजीनगर येथे संपन्न
करमाळ्यातून किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण व किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर यांची उपस्थिती
भाजपा किसान मोर्चा ची राज्यस्तरीय संघटन पर्व सभासद नोंदणी कार्यशाळा संभाजीनगर येथे संपन्न
करमाळ्यातून किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण व किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर यांची उपस्थिती
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३१/ भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी लोकसभा व राज्याच्या विधानसभा निवडणुकानंतर पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. ते भाजपा किसान मोर्चा राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या एप्रिल महिन्यापर्यंत या निवडणुका लागतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये पक्ष खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने एकतर्फी जनादेश दिलेला आहे. या डबल इंजिन सरकारचा लाभ निश्चित राज्यातील शेतकरी वर्गांना होणार आहे. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान धोरणात्मक व संशोधन विस्तार आराखड्यासाठी शासन प्रयत्नशील आहे वीज, सौर ऊर्जा, दुधाचे अनुदान याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत आहे तर नाफेड, आत्मा, फार्मर प्रोडूसर कंपन्या यामधून शेतकऱ्यांचे हित जोपासले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे नवनिर्वाचित ओबीसी, दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बाबीवर विषय मांडले तसेच प्रातिनिधीक स्वरूपात सदस्य नोंदणी करण्यात आली. तसेच प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी राज्याचा संघटनात्मक आढावा मांडला. प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, रामकृष्ण वेताळ, रंगनाथ सोळंके, ललित समुद्रकर आदि प्रदेश सरचिटणीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत 15 जानेवारीपर्यंत किसान मोर्चाच्या माध्यमातून राज्यामध्ये विक्रमी सभासद नोंदणी करू असे संबोधित केले.
या कार्यशाळेमध्ये वेगवेगळे ठराव झाले तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेेगडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला. या राज्यस्तरीय कार्यशाळेत करमाळ्यातून किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण तसेच किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर हे उपस्थित होते.