आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न. . .
आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न. . .
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
चास : सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतन चास अहिल्यानगर येथे नुकतेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा व सर्वांगीण विकासावर चर्चा घडवून आणण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अनिरुद्ध आडसूळ, संस्थेच्या सेक्रेटरी सौ. लीना आडसूळ, खजिनदार परमेश्वर आडसूळ, डायरेक्ट मा. कृष्णा अनिरुद्ध आडसूळ, आडसूळ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर. एस. गडाख आणि विद्यार्थाचे पालक प्रतिनिधी गावखरे आर. के. , सौ. सोनाली रमाणानी, सुलाखे साहेब, शिंदे अशोक आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी संस्थेचे मान्यवर यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख प्रा. आकांक्षा म्हस्के यांनी संस्थेचा सुरुवातीपासून ते आज पर्यंतचा वाढलेला प्रचंड विस्तार व वाढत्या विस्ताराबरोबर वाढती प्रवेश संख्या व शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली उपाययोजना, क्रीडा, कला व कौशल्य इत्यादी क्षेत्रातील विविध स्तरावरील स्पर्धेत तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राविण्य याचा आढावा चित्रफित व सादरीकरणाद्वारे उपस्थितांसमोर मांडला.
एम. एस. बी. टी. ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये आडसूळ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरगोस यश मिळवलेले असून तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे.
स्थापत्य अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी गायकवाड केशव ९१.६० टक्के, प्रतीक्षा चोरमागे हिने एका विषयात ७० पैकी ७० गुण मिळवून संपूर्ण परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले ठाकरे निर्मल याने ८८ टक्के गुण मिळवले. संगणक विभागातून रमणाणी दिव्या ९२.३३ टक्के, गावखरे तन्मय ९०.५६ टक्के, शिंदे श्रुती ८८.११ टक्के आणि जोशी गार्गी हिला ८७.५६ गुण मिळाले. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी खळदकर मानसी ८४.५८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. विद्युत अभियांत्रिकी विभागातून पानसंबळ ओमकार ८२.१० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून कुलट श्रावणी हिला ८२.८९ टक्के, आनंदकर सार्थक ८२.८४ टक्के तर दारकुंडे सुरज ८२.७४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचे व दर्जेदार शिक्षण पद्धतीचे दर्शन घडून आणले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सदर मेळाव्यामध्ये तंत्रनिकेतन च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पालक प्रतिनिधी म्हणून आलेले बेद्रे साहेब , सुलाखे साहेब, डॉ. चेमटे आणि गावखरे राजेंद्र यांनी आपली मते व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी बरड माळरानावर शैक्षणिक संकुल उभारून पंचक्रोशीतीलच नव्हे तर तर संपूर्ण जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
व तंत्रनिकेतनच्या गुणवत्तेचा वाढता आलेख पाहता यामध्ये तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर. एस. यांचे व्यवस्थापन व त्याचे काटेकोरअंमलबजावणी करणारे शिक्षक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केले.
पालकांशी संवाद साधताना तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर. एस. गडाख म्हणाले विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासा बरोबरच सर्वांगीण विकास साधन्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक या त्रिकोणा मधला सुसंवाद मजबूत असला पाहिजे. पाल्य आणि शिक्षक यांचा एक संवादात्मक मेळ असणे गरजेचे आहे, असे सांगत प्रभावी व परिणामकारक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची असते आपल्या पाल्याची वर्गामधील नियमित उपस्थिती नुसती शारीरिक उपस्थित असून चालणार नाही तर विद्यार्थी हा मानसिकरित्या वर्गात उपस्थित असला पाहिजे. आठवडा चाचणी व वर्ग चाचण्यातील मिळालेले गुण, पाल्याचा नियमित अभ्यास, वर्गशिक्षकांशी पालकांचा सुसंवाद आदी गोष्टीकडे पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे तंत्रनिकेतन कटिबद्ध असून खडू व फळा या प्रचलित पद्धतीवर अवलंबून न राहता अत्याधुनिक डिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब हे तंत्रनिकेतन सातत्याने करत आलेले आहे. उत्कृष्ट अभियंता हा फक्त पुस्तकी ज्ञानावरच घडत नाही तर त्यासाठी प्रात्यक्षिकाची गरज असते तंत्रनिकेतन मधील उपलब्ध असलेल्या अद्ययावत प्रयोगशाळा व त्यातील उपकरणे यांचा भरपूर सराव करून कौशल्याधिष्ठित अभियंता घडला पाहिजे आजच्या काळाची गरज आहे. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी प्रशस्त अशा वस्तीगृहाची सुविधा संस्थेमार्फत होत असल्याचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी जाहीर केले. संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध प्रेरणादायी दाखले देऊन सततच्या प्रयत्नानेच यश प्राप्ती करता येते जेमतेम परिस्थितीतही विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठता येते असे मत आपल्या आत्मकथनातून स्पष्ट केले. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये ६५० मुलींसाठी तर ६१० मुलांसाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षा २०२५-२६ मध्ये वस्तीगृहाचे काम हे पूर्ण होईल अशी आश्वासन पालकांना दिले.
याप्रसंगी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. मिनेश जगधने , विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील पवळे, मेकॅनिकलचे विभाग प्रमुख प्रा. महेंद्र जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशनच्या विभाग प्रमुख प्रा.सोनाली पाळंदे, संगणक विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता होले , स्थापत्य अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख प्रा.आकांक्षा म्हस्के, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतीक्षा चोरमागे तर आभार प्रदर्शन श्रावणी कोमकुल हिने केले.