Breaking
ब्रेकिंग

उन्हाळ्यात १७ गावांना भीषण पाण्याची टंचाई*

४ गावाना टँकर सुरू ,४ गावांचे  टँकर प्रस्ताव पाठवले तर ९ गावांसह १२ विहिरी अधिग्रहित*

0 4 3 3 2 5

*उन्हाळ्यात १७ गावांना भीषण पाण्याची टंचाई*

*४ गावाना टँकर सुरू ,४ गावांचे  टँकर प्रस्ताव पाठवले तर ९ गावांसह १२ विहिरी अधिग्रहित*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर तालुक्यात उन्हाचा पारा वाढल्याने भूजल पातळी खालावत चालली असून तालुक्यात चार गावांना टँकर सुरू झाले आहेत तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.तालुक्यातील डांगर  ,जानवे , सबगव्हाण आणि तरवाडे या गावांना  टँकर ने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर मंगरूळ , चोपडाई , कोंढावळ या गावचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. दहिवद खुर्द , पळासदळे ,  नगाव बुद्रुक , गडखांब , मांजरडी , लोणे , मेहेरगाव ,धुपी ,जुनोने या ९ गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर टँकर भरण्यासाठी अमळनेर नगरपालिका , धावडे ग्रामपंचायत आणि भिलाली ग्रामपंचायतींच्या विहिरी टँकर भरण्यासाठी  अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात मंगरूळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. मात्र गावकऱ्यांनी बोरी नदीवरून पाणी नको तापी नदीवरून पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केल्याने पाणी पुरवठा योजना रखडली आहे. त्यामुळे आज टंचाईला सामोरे जावे लागत आहे.खासदार स्मिता वाघ यांची अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याची मागणी दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील विहिरी नाले आणि जलस्रोतांची भूजल पातळी खालावली आहे.  खासदार स्मिता वाघ यांनी पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी धुळे जिल्हाधिकारींना पत्र पाठवून अमळनेर तालुक्यातील १६ गावांच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी किती पाणी सोडावे लागेल याबाबत अहवाल पाठवून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे