२६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहण न झाल्याने कारवाईसाठी म्हस्के यांचा आमरण उपोषणाचा इशारा

२६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहण न झाल्याने कारवाईसाठी म्हस्के यांचा आमरण उपोषणाचा इशारा
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
नगर तालुक्यातील१०५ गावा पैकी दहिगाव असे गाव आहे.गेले अनेक वर्षापासून २६ जानेवारी,१५ ऑगस्ट १ में ग्रामपंचायत शासकीय कार्यालय समोर भारतीय तिरंगा ध्वज फडकवला जात नाही.माझ्या वया प्रमाणे दहिगाव मध्ये आता पर्यंत ग्रामपंचायत दोन नवीन इमारत कार्यालय झाली सदर कार्यलयात १३ वर्ष कार्यरत असलेले एकच ग्रामसेवकानी आपल्या कॅबिनला काळ्या काचा लावल्या पण तिरंगा ध्वजारोहण करण कधी शासकीय सेवक म्हणून कर्तव्य वाटले नाही. एवढं मोठं शासकीय कर्तव्यात कसुरता केलेली पण वरीष्ठ गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी दहिगाव मध्ये काय तपासणी करत होते…? वरिष्ठ म्हणून काय नियंत्रण ठेवले यात वरिष्ठ अधिकारी सुध्दा तेवढं दोषी आहेत सदर प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरहि तब्बल कारवाई साठी पाच महिने अहवला साठी का लागतात राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध कायदा १९७१ कायदा, भारतीय ध्वजसंहिता संविधानातील अनुच्छेद ५१ क,का नुसार देशद्रोहाचा गुन्हा आहे.भारतीय ध्वज संहिता २००६ गृहमंत्रालय भारत सरकार ध्वज संहिता पालन नाही, ध्वज संहिता मध्ये सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नियम ठरलेले आहेत.एवढे सर्व नियम असुन देखील महाराष्ट्र शासनाचे शासकीय ग्रामसेवकावर कडक कारवाई होण अपेक्षित आहे. तसेच या ठिकाणी सरपंच सदस्य तेवढं जबाबदारी आहेत. ईतर शासकीय कर्मचारी यांनी सुध्दा सदर गंभीर बाब शासनाच्या वरिष्ठांच्या निर्देशानस आणलेली नाही.
ग्रामपंचायत कार्यालय एक शासकीय कार्यालये गणले जाणारे कार्यालय आहे. ग्रामसेवकांची जबाबदारी कर्तव्य आहे. या पुर्वी सदर ठिकाणी जर ध्वजारोहण होत नाही यांचा अहवाल कधी शासकीय कर्मचारी म्हणून सादर केलेला का नाही… असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सदर ठिकाणी ध्वजारोहण करणे आवश्यक आहे. या अंत्यत महत्वाचा संवेदनशील विषयी अहलवास पाच महिने कालावधी लागणे म्हणजे आथिर्क तडजोड झाल्याचा संशय आहे.सदर विषयी नियमानुसार तात्काळ अहवाल सादर करणं आवश्यक होते.आता हे संगनमताने सर्व ठरवुन रंगवून अहवाल सादर होणार यांत शंका नाहीं असे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपलं मत आमच्या प्रतिनिधीकडे माडंले आहे.
२६ जानेवारी ध्वजारोहण कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के २५ जून पासून पंचायत समिती कार्यालय समोर अमरण उपोषणाला बसण्याचा लेखी नोटीस गटविकास यांनी दिलेले आहे.
तसेच या २६ जानेवारी ध्वजारोहण तक्रार २६ जानेवारी दिवशी गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर, विस्तार अधिकारी नगर , कार्यालयीन प्रमुख यांना भ्रमणध्वनी द्वारे सर्व हकीकत कथन केली तसेच २७ जानेवारीला जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार नगर, यांना लेखी दिली
तसेच ईमेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल,भारताचे राष्ट्रपती महोदय महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव. यांना लेखी तक्रार दाखल केली आहेत.
तसेच भारताचे राष्ट्रपती महोदय कार्यालयाने या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागाना कारवाई आदेश दिले परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना आदेश असतानाही सदर तक्रारीला पाच महिने उलटून गेले तरी या कारवाई अहवाल हा गुंडाळून ठेवलला या बाबतीत पंचायत समिती नगर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटुन संबंधित लेखी तक्रार आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. असं सांगितले फोनद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारीनी गटविकास अधिकारी सोनकुळे नगर यांना तातडीने कारवाई अहवाल पाठवा, पण यां गटविकास अधिकारी यांना फोनद्वारे सक्त आदेश देऊन देखील संबंधित तक्रार अहवाल पाठवुन कारवाई करावी पण एवढं बजावले तरी सुद्धा काही हालचाल अहवाल आलेला नाही. कोणाच्या दबावाखाली सदर कारवाई रखडली आहे. २६ जानेवारी ध्वजारोहण न झाल्याने या साठी सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांचे अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.