तनपुरे कारखान्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कामधेनू वाचवा अन् चालू करा- महंत अर्जुन महाराज तनपुरे

तनपुरे कारखान्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कामधेनू वाचवा अन् चालू करा- महंत अर्जुन महाराज तनपुरे
राहुरी / प्रतिनिधी : जावेद शेख
डॉ. तनपुरे साखर कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून अनेकांचे संसार या कामधेनूवर अवलंबून आहे. यात राजकारण न करता समाजकारण करून शेजारील कारखान्यांचा आदर्श घ्यावा. ती कारखाने सुअवस्थेत असताना बिनविरोध होतात. तर आपली कामधेनू बंद अवस्थेत असताना निवडणूक कशासाठी ? सर्वांनी एकत्र येऊन कामधेनू वाचवा व चालू करा, असे आवाहन महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी केले.
‘गोपाला- गोपाला, देवकीनंदन गोपाला’ व ‘ज्ञानोबा-तुकोबा’ आणि महिपती राया, माझ्या सदगुरू नाथा या जयघोषात श्री संत कवी महिपती महाराजांच्या ५९ व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाची महंत अर्जुन महाराज तनपुरे काल्याच्या किर्तनाने व दहीहंडीने शुक्रवारी सांगता झाली.
राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊसच्या प्रांगणा गेल्या ७ दिवसापासून फिरता नारळी सप्ताहनिमित्त विविध नामवंत कीर्तनकारांनी केलेल्या कीर्तन सेवेमुळे हा परिसर अक्षरशः भक्तिमय होऊन गेला होता. सकाळ व संध्याकाळ ह्या दोन्ही सत्रात कीर्तन सेवा असल्यामुळे ह्या परिसराला पंढरपूरचे स्वरूप आले होते. महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या गायनामुळे परिसर दुमदुमून गेला होता. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांनी काल्याच्या कीर्तनात भगवंताच्या विविध लीला सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. सप्ताह कमिटीने संत महिपतींचा मनोरथ पूर्ण केला. वारकरी संप्रदाय वैभवशाली गाली आहे. दुष्काळात महिपतींनी आपला संसार गोरगरिबांना वाटून दिला. महिपतींचे वाडःमय महान आहे. समाजाला चांगली दिशा मिळावी, म्हणून महिपतींनी संत चरित्रे रेखाटली. साधू झोपला का ? समाज झोपतो. अज्ञानरूपी समाजाला घडविण्यासाठी संतांचे मोठे उपकार आहेत. हेच कार्य महिपतीने आयुष्यभर केले. संत महिपती कलियुगातील व्यास होय, असे गौरवोद्वार महाराजांनी काढले.
यावेळी लक्ष्मण महाराज पांचाळ, अण्णा महाराज गागरे, अण्णा महाराज लोंढे, बाबा महाराज मोरे, संजय महाराज शेटे, पांडुरंग महाराज पठारे, अनिल महाराज टेकूडे, किशोर महाराज शेळके, अनर्थे महाराज, विलास महाराज कोतकर, कैलास महाराज पवार, प्रशांत महाराज थोरात, आबा महाराज कोळसे, बापू महाराज गागरे, बाबासाहेब महाराज वाळुंज, दुर्गाप्रसाद महाराज तिडके तसेच माजी आ.चंद्रशेखर कदम, आसाराम ढुस, सुरेशराव वाबळे, शिवाजीराव कपाळे, सुरसिंग पवार, मच्छीन्द्र कोहोकडे, शिवाजीराव बंगाळ, माऊली कोळसे
सत्यजित कदम, सौ.प्रीती कदम, अमोल भनगडे, आप्पासाहेब ढुस आदिंसह मान्यवर , देणगीदार व भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते. सप्ताह यशस्वीतेसाठी सप्ताह कमिटी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.