पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा ‘नगरचे जिगर’ संस्थेकडून सन्मान व गौरव संपन्न
पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा ‘नगरचे जिगर’ संस्थेकडून सन्मान व गौरव संपन्न
प्रतिनिधी : धीरज लांडगे
नगर पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टला ‘नगरचे जिगर’ आणि छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. माऊली सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक केतन पुरी आणि अॅड. रविंद्र शितोळे यांच्या हस्ते ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल व वरद लक्षेट्टी यांनी हा सन्मान स्वीकारला.
संस्थेचे राजेंद्र बुलबुले यांनी सांगितले की, पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टने सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. कोविड काळात गरजू, एकटे, आजारी, वृद्ध, विधवा महिलांना सलग तीस दिवस जेवण पुरविण्याचे केलेले कार्य, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, वह्या, दप्तर यांचे वाटप, तसेच अनाथ व निराधार कुटुंबांना वैद्यकीय मदत यांसारख्या उपक्रमातून या संस्थेने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या कार्याची दखल घेवुन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा ‘नगरचे जिगर’ संस्थेकडून आमदार संग्राम जगताप, व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक केतन पुरी, अॅड. रविंद्र शितोळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल यांनी सांगितले की, हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही फक्त आमचे कर्तव्य पार पाडत आहोत, पण समाजाने आणि ‘नगरचे जिगर’ सारख्या संस्थेने आमच्या कार्याची दखल घेतली, हे अधिक जबाबदारीची जाणीव करून देते. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत मदतीचा हात पोचवण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरूच राहील. आम्ही कुठलाही गाजावाजा न करता केवळ सेवाभावातून काम करत आहोत आणि याच तत्त्वावर आम्ही आमचे सामाजिक कार्याचा विस्तार करत आहोत .
सूत्रसंचालन घुले सर यांनी केले . आभार प्रदर्शन संस्थेचे प्रविण गोधडे यांनी केले.



