ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये करियर मार्गदर्शनपर परीसंवाद
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये करियर मार्गदर्शनपर परीसंवाद
प्रतिनिधी : राजेश बाष्टे
शुक्रवार, दि.२१नोव्हेंबर २०२४ रोजी,सकाळी ११ वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज आणि विद्यासन एज्युकेशनल फाउंडेशन,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शनपर परीसंवादाचे ‘मिनी वेध’ या उपक्रमा अंतर्गत आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील ,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते श्री.अजित देशमुख,मुलाखतकार सौ.सुजाता पाटील तसेच विद्यासन एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य ॲड.नीला तुळपुळे,कु.हर्षदा खानविलकर,श्री.उमेश वाळंज,सौ.जान्हवी आगाशे,सौ.प्राची देशमुख आणि लॅा कॅालेजमधील प्रा.डॅा.संदिप घाडगे प्रा.निलम म्हात्रे,प्रा.चिन्मय राणे,प्रा.कौशिक बोडस,प्रा.सुरज पूरी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रा.पियुषा पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लॅा कॅालेजमधील आय.क्यु.ए.सी.आणि करियर गायडन्स समितीमार्फत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.प्रा.कौशिक बोडस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या परिसंवादामध्ये निवृत्त पोलिस अधिकारी श्री.अजित देशमुख यांची ‘पोलिस जीवनातील प्रवास’ या विषयावर मुलाखत सौ.सुजाता पाटील यांच्यामार्फत घेण्यात आली.पोलिस कर्मचारी हे ‘अनसंग वॅरियर्स’आहेत कारण पोलिस ज्या पध्दतीने काम करतात त्याबाबत त्यांना फार प्रसिध्दी मिळत नाही.पोलिस कश्या पध्दतीने गुन्हेगारांकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली करुन घेतात याबात अनुभवांचे कथन केले.सराईत गुन्हेगारांची मानसिकता कशी असते याबाबत माहिती दिली.तंत्रज्ञानामुळे बदललेली गुन्हे तपासाची कार्यप्रणाली आणि त्यात लपलब्ध असलेल्या करियरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.पोलिसांविषयी सामान्यांच्या मनात असलेल्या भीतीचे कारण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये दडलेले आहे याबाबत त्यांनी स्ष्टीकरण दिले.विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त न्यायालयामध्ये उपस्थित राहून उलट तपासणी कशी केली जाते तसेच पोलिस अधिकारी कोणत्या पध्दतीने काम करतात याविषयी ज्ञान प्राप्त करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.पोलिस व्यवसायामधील शिस्त आणि कामाची पध्दत यामुळे पोलिसांचे जीवन समाजाभिमुख बनते असे प्रतिपादन केले.पोलिस शाखा कायदा आणि सुव्यवस्था,गुन्हे प्रतिबंध याबाबत कर्तव्यनिष्ठेने कसे काम करते याविषयी अनुभव कथन केले.
दहशतवाद आणि अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री याप्रकारचे गुन्हे तरुण पिढीसाठी कसे घातक आहे याबाबत उदाहरणासहित माहिती दिली.विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी फिरेन्सिक सायन्स,टॅक्सेशन,फॅमिली लॅा यामध्ये स्पेशलायजेशन करावे याबाबत मार्गदर्शन केले.स्त्री पोलिस कर्मचारी यांचा गुन्हे तपासामधील सहभाग हा स्त्री गुन्हेगारांच्या गुन्हयांची कारणमीमांसा करण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे स्त्रियांनी पोलिस होण्यासाठी स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत कराव्यात असे प्रतिपादन त्यांनी केले.स्त्रिया इंटेलिजन्स ब्युरोमध्येसुध्दा आपला ठसा उमटवत आहेत ही महत्वपूर्ण बाब आहे असा उल्लेख त्यांनी केला.न्याययंत्रणेचे दोन महत्वाचे घटक म्हणजे पोलिस आणि वकिल यांच्यामधील समन्वय गुन्हे रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले.