
बुद्ध आपलेसे करण्यासाठी अमुक धमुक जातीचे असण्याची गरज नाही
” जो शुद्ध है वो बुद्ध है”
बुद्ध आपलेसे करण्यासाठी अमुक धमुक जातीचे असण्याची गरज नाही . बुद्ध आपलेसे करण्यासाठी विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ मेंदू असण्याची आणि शुद्ध अंतकरणाची गरज आहे.
” जो शुद्ध है वो बुद्ध है”
प्रतीतसंम्युत्तीवाद अर्थात प्रत्येक गोष्टीला कारण आहे कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही हा कार्यकारण भाव एकदा समजला की गंडे दोरे अंगारे धुपारे या कर्मकांडांना काही स्थान उरत नाही.
मला बुद्ध जवळचे वाटतात कारण बुद्धांनी तर्कनिष्ठता शिकवली. बुद्ध सांगतात, “मी ईश्वर नाही … ईश्वराचा प्रिय पुत्रही नाही.. मी ईश्वराचा दूतही नाही.. मी कुणाचाही दिव्य संदेश घेऊन आलेलो नाही… मी तुमच्यासारखाच हाडामासाचा, दोन हाताचा, दोन पायांचा माणूस आहे. माझा अवतार वगैरे काही नाही. जसा तुम्हाला जन्म आणि मृत्यू आहे तसाच मीही जन्म आणि मृत्यूला बांधील आहे .
मला फक्त एवढेच सत्य उमगले आहे, तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे दुःख मुक्त व्हायचे असेल तर आधी तृष्णामुक्त व्हावे लागेल.वैशाख पौर्णिमा तथा बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा 🌹🙏
माहिती संकलन : प्रा. डॉ .मोरे न्यू लॉ कॉलेज, अहिल्यानगर



