Breaking
ब्रेकिंग

भिंगार तलाठी कार्यालयात एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट  ?

तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा - - अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

0 3 9 0 9 3

भिंगार तलाठी कार्यालयात एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट  ?

तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा – – अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

पालकमंत्र्यांना दिले निवेदन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्या नगर जिल्ह्यातील भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व दरपत्रक लावण्यात यावे यासाठी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (पालकमंत्री अहिल्या नगर जिल्हा ) यांना निवेदन देण्यात आले .

सदर निवेदनात म्हटले आहे की, अहिल्या नगर जिल्ह्यातील भिंगार तलाठी कार्यालयात एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत आहे.सदर कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून, नागरिकांची लूट थांबविण्यासाठी तातडीने सदरची उपाय योजना करण्यात यावी.या विषयावर
संघटनेच्या शिष्टमंडळाने दिं- १३/२/२०२५ रोजी अहिल्या नगर जिल्हा अधिकारी साहेब,तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले व तसेच भिंगार गावातील मंडळ अधिकारी ( सर्कल) यांची दिं- १७-२-२५ रोजी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.परंतु अद्यापही भिंगार तलाठी कार्यालया मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावण्यात आले नाही.
तलाठी कार्यालयातील दररोजच्या कामकाजावर कॅमेऱ्यांची निगराणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सध्या या कार्यालयात उत्पन्न दाखला, जागेच्या नोंदी आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आहे.परंतु येथे दरपत्रक सुद्धा लावलेले नाही,ज्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि नागरिकांची लूट होत आहे. तलाठी कार्यालयात बाहेरचे एजंट लोक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामे करून घेत आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले आहेत,परंतु भिंगार तलाठी कार्यालयात अद्याप अशी व्यवस्था का ? नाही.तरी संघटनेच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की भिंगार तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी,तलाठी व कर्मचारी यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी व भिंगार तलाठी कार्यालय मध्ये लवकरात लवकर सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे व‌ दरपत्रक बसण्यात यावे असे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना देण्यात आले . या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा उपसचिव आकाश ठाकुर, जिल्हा उपसचिव पवन सेवक, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घोडके,विकास पंडित,दिलीप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे