विजेच्या खांबाला शॉक बसुन चिमुकल्या मुलीचा मृत्यू ; महावितरणच्या विरोधात लोक प्रतिनिधी व नागरिकांचा संताप
विजेच्या खांबाला शॉक बसुन चिमुकल्या मुलीचा मृत्यू ;
महावितरणच्या विरोधात लोक प्रतिनिधी व नागरिकांचा संताप
अहिल्यानगर / प्रतिनिधी
अहिल्यानगर : स्टेशन रोड परिसरात पावसात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका साडेतीन वर्षीय चिमुकल्या मुलीचा नाहक बळी गेला आहे . स्टेशन रोडच्या प्रभाग क्र .१५ मधील आनंदनगर येथील प्रीती गांगुर्डे या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा पावसात विजेच्या खांबाला शॉक बसुन मृत्यु झाला . सदर खांबाच्या दुरुस्तीबाबत आनंदनगर येथील रहिवाशांनी अनेकदा निवेदने दिली महावितरणला दुरुस्ती बाबत विनंती केली . परंतु महावितरणचा भोंगळ कारभार पहाता एका चिमुरड्या मुलीचा वीजवाहक खांबाचा शॉक लागून मृत्यु झाला आहे . प्रभागातील नगसेवक दत्ता गाडळकर, नगरसेवक संकेत गवाले, नगरसेविका गीतांजली काळे यांनी घटनेची दखल घेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत महावितरण कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले आहे .
अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करूनही महावितरणच्या गलथान कारभारामुळे आनंदनगर मधे एका चिमुरडीचा जीव गेला आहे . याची जबाबदारी संबंधीत अधिकारी घेणार का ? याचा सोक्षमोक्ष होईपर्यंत आम्ही महावितरण कार्यालया समोर ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार आहोत .
दत्ता गाडळकर ( नगरसेवक )


