भाजपाच्या पदाधिकारी निवडीत शहर जिल्हाध्यक्षपदी गोपाल वर्मा यांचे नाव चर्चेत
भाजपाच्या पदाधिकारी निवडीत शहर जिल्हाध्यक्षपदी गोपाल वर्मा यांचे नाव चर्चेत
प्रतिनिधी : महेश कांबळे
नगर- : अहिल्यानगर शहर जिल्ह्याचे युवा नेतृत्व,सोनार समाजातील उद्योनमुख नेतृत्व व सध्या भाजपाचे सहचिटणीस असलेले गोपाल वर्मा यांचे लवकरच होणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी निवडीत अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी नाव चर्चेत आहे
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने तत्पूर्वी जिल्ह्या पासून राज्यपातळीवरील सर्व निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात देखिल भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.जिल्हा व राज्याची निवडणूक पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
सध्या शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी गोपाल वर्मा,सचिन पारखी,धनंजय जाधव,सुवेंद्र गांधी, बाबा सानप,भैय्या गंधे,मिलिंद गंधे,नितीन शेलार,रवींद्र बारस्कर,रामदास आंधळे,करण कराळे,तुषार पोटे,राजाभाऊ सातपुते आदी नावे चर्चेत आहे त्यामध्ये गोपाळ वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे.कार्यकर्त्या मध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
वर्मा हे मागील १५ वर्षांपासून एकनिष्ठतेने पक्षाचे काम करीत आहे. मोदींजी च्या महत्वकांक्षी कार्यापैकी एक असलेल्या मन की बात चे ते नगरचे सहसंयोजक म्हणून जनते पर्यंत पोहचले आहेत, नमो ऐप च्या माध्यमातून लोकांना जोडणारे,ग्राउंड लेव्हल वर काम करणारे व सरकारची प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहचवून सदस्य नोंदणी साठी काम करणारे गोपाळ वर्मा असल्याने वरिष्ठ नेते त्याच्या नावाला पसंती देतील असे वाटते,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे चांगले काम केले.त्यामुळे शहर अध्यक्षाची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे .