Breaking
ब्रेकिंग

खडांबे खुर्द’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिला दिवस नवगतांसाठी आनंदउत्सवाचा..!!

नवगतांचे ढोल ताशांच्या गजरात  गावात प्रभात फेरी काढत औक्षण करत गुलाब पुष्प देऊन स्वागत...

0 4 3 3 7 3

खडांबे खुर्द’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिला दिवस नवगतांसाठी आनंदउत्सवाचा..!!

नवगतांचे ढोल ताशांच्या गजरात  गावात प्रभात फेरी काढत औक्षण करत गुलाब पुष्प देऊन स्वागत…

राहुरी तालुका जावेद शेख

  राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावांत प्रभात फेरी काढत औक्षण करून कुंकवाने पहिले पाऊल उमटवून गुलाब पुष्प देऊन अतिशय सुंदर नियोजनाने स्वागत करण्यात आले.
      तदनंतर उपस्थित पालक आणि ग्रामस्थांच्या  हस्ते मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश, बूट,सॉक्स, आणि शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
      या नवगतांच्या पहिल्या दिवसाच्या स्वागत प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश हरिश्चंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा. युवा मोर्चा चे अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, माजी  ग्रामपंचात सदस्य गणेश पारे,संदीप खळेकर,अमोल हरिश्चंद्रे,भास्कर रसाळ, त्रिंबक रसाळ,सचिन काळे, संभाजी कल्हापुरे, श्रीमती हर्षदा साळवे, सुनिता भोकरे,काजल शिंदे,किरण भालेकर,उर्मिला दुबे, कल्पना नन्नवरे आदींसह अनेक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        उपस्थित पालक आणि ग्रामस्थ यांनी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक जीवनात यशवंत आणि कीर्तिवंत व्हा तसेच शाळेबरोबरच गावचा देखील नावलौकिक वाढावावा अशा आशयाच्या शुभेच्या देण्यात आल्या.
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक मारुती कुलट यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा विप्रदास यांनी केले, शिक्षिका मंदा कुलट  यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका श्रीमती मनीषा कोष्टी यांनी कष्ट घेतले आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांना साथ दिली. या कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

” जिल्हा परिषद शाळेत आपल्याच गावातील चिमुकले घडतात  येथील कार्यरत असलेले शिक्षकच त्यांना हवा तसा आकार देऊन चिखलाची जशी मूर्ती बनवतात अगदी तसेच हे विद्यार्थी देखील हवे तसे मूर्तिवंत घडविण्याचं पवित्र कार्य हे येथील सर्वच शिक्षक आणि शिक्षिका  अतिशय पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे करतात ; परंतु आजचे हेच विद्यार्थी उद्याचे सुजान नागरिक आणि ग्रामस्थ आहेत  तसेच गावच आणि देशाच भविष्य देखील यांच्याच हातात आहे म्हणून आपण देखील शाळेला वेळोवेळी भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेऊन त्या वेळोवेळी  सोडविल्या पाहिजे. शाळेतील आहार,स्वच्छता,पाणी, आणि इतर आवश्यक बाबी पाहणे महत्वाचे आहे. येणाऱ्या अडीअडचणी देखील दूर करण्यातसाठी योग्य अशी  भूमिका बजावली पाहिजे. ग्रामस्थ आणि सुजान, जागरूक पालक म्हणून आपले कर्तव्य आहे ते देखील आपण प्रामाणिक पणे पार पाडावे. आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती समजण्यासाठी आपण वेळोवेळी शाळेत यायला पाहिले आणि शिक्षकांबरोबर सुसंवाद ठेवायला हवा प्रभाकर हरिश्चंद्रे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे