कुकडीचे पाणी सिनेत सोडून सर्व बंधारे भरून घ्यावेत:- भाजपा सोलापूर जिल्हाचिटणीस विनोद महानवर यांची पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी

कुकडीचे पाणी सिनेत सोडून सर्व बंधारे भरून घ्यावेत:- भाजपा सोलापूर जिल्हाचिटणीस विनोद महानवर यांची पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १७/ कुकडीचे पाणी सिनेत सोडून सर्व बंधारे भरून घ्यावे अशी मागणी भाजपा सोलापूर जिल्हाचिटणीस विनोद महानवर यांनी पालक मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. सीनानदी वरती आसलेले खडकी, तरडगाव, संगोबा हे तिन्ही बंधारे फेब्रुवारी मधेच कोरडे पडले असून सीनानदीच्या शेजारील गांवाना पाणी टंचाई जाणवू लागली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. या क्षेत्रात ऊस आणि केळी मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून करमाळा हाद्दीतील तिन्ही बंधारे कोरडे पडली आहेत. या वर्षी लवकरच उन्हाची तीव्रता जाणवत आहे त्या मुळे मुक्या प्राण्यांची सुध्दा चिंता शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेऊण सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेबांनी लक्ष्य घालून कुकडीचे पाणी सीनानदी मधे सोडून सर्व बंधारे भरून घ्यावे आणि सीनाकाटच्या शेतकर्यांचा व मुक्या प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली विनोद महानवर यांनी केली आहे.