महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांना चांगला कामाचे फळ पक्ष देणारचं

महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांना चांगला कामाचे फळ पक्ष देणारचं
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- जळगाव जिल्हयातील अमळनेर तावुक्यातील युवा तरुण तडफदार नेतृत्व जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील सध्या जोरदार काम करत आहे.ते दिवस राञ एक करुन
विद्यार्थांनासाठी लढा देत आहेत.अशा प्रकारचे काम
करत असताना मागचा पुढचा विचार न करता ते न्याय
देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याने त्यांना पक्ष संधी
देत आहे.पण ते योग्य संधीची वाट पाहत आहे.
महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी केलेल्या कामांची त्यांना चांगलीच ऑफर चालू असल्याचे कळतंय. दिपक पाटील हे खरंतर महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्षा शुभांगी ताई पाटील. यांनी ही जबाबदारी त्यांना तीन वर्षांपासून सोपवली असून त्यांनी चांगलीच कामगिरी करून दाखवल्या मुळें आता अनेक पक्ष त्यांना जबाबदारी देऊ इच्छितात परंतू दिपक पाटील हे नकार देत असल्याचं कळतंय परंतू दिपक पाटील हे शरद पवार गटाचे डाॅक्टर सेल्स चे प्रदेश अध्यक्ष तुषार संनसे यांच्या संपर्कात असल्याचे सुत्रांकडून कळतंय.
विद्यार्थीनींन कडून शालेय शिक्षणासाठी लागणारी फी घेत असल्याची माहिती समोर आली दिपक पाटील यांनी ताबडतोब त्या विषयावर माहिती मिळवली. महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक खर्च हा राज्य सरकार पुरवणार मुलींना एक रुपया देखील शाळेत अथवा काॅलेज ला देण्याची गरज नाही पण वास्तविक पाहता ते तसं नाही. सरकारने फक्त जीआर काढला असून त्याची अंमलबजावणी शाळांना परी पत्रक दाखल केले नाहीत. विनाअनुदानित शाळा अथवा काॅलेज त्यांना लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी वरून च ते करत असतात त्यांना एक रूपया देखील शासनाकडून येतं नाही म्हणून विद्यार्थीनींनी आपला गैरसर्भम दूर करावा लवकरच महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन च्या राज्य अध्यक्षा शुभांगी ताई पाटील या राज्य स्तरावर पाठपुरावा करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही, याबाबत दिपक पाटील यांनी चिंता व्यक्त केली. दिपक पाटील यांची योजना आहे की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार (ठढख) अर्ज दाखल करणार आहेत. गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी
करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे दिपक पाटील म्हणाले.बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दिपक पाटील यांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.