वाहन हळू अथवा जोरात चालवणे आपल्याच हातात – सत्रन्यायाधीश संजय कुलकर्णी
श्रीरामपूर आरटीओ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान
वाहन हळू अथवा जोरात चालवणे आपल्याच हातात – सत्रन्यायाधीश संजय कुलकर्णी
श्रीरामपूर आरटीओ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान
दुचाकी चालविताना हेल्मेट चा वापर करावा !
चारचाकी चालवताना नको शिटबेल्टशी दुरावा !!
राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख
समोच्या वाहनचालकाची चुकी असली तरी आपण अपघात टाळू शकतो कारण आपले वाहन जोरात किंवा हळू चालवायाचे हे आपल्याच हातात असते असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजय कुलकर्णी यांने केले.काल श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष सत्रन्यायाधीश संजय कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.बी गीरी, सहदिवाणी न्यायाधीश विनय कांबळे,डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुंजे,ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, पो.नि. नितिन देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरिक्षक पद्माकर पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धीरज भामरे, रोहीत पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रस्ता सुरक्षा अभियान पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना सत्रन्यायाधीश संजय कुलकर्णी म्हणाले की, एका अपघाताच्या खटल्याची माहीती एका मुलाचे वडील सांगत होते ती अशी की, आम्ही अकोल्याहून शेगांवला चाललो होतो, समोरून भरधाव वेगाने एक वाहन आले आणि त्या वाहनाने आमच्या वाहनास जोराची धडक दिली, त्यात मी गंभीर जखमी होवून जागेवरच बेशुद्ध पडलो, तदनंतर मला तब्बल तीन दिवसांनी शुद्ध आली, त्यात माझी पत्नीही जखमी होवून बेशुद्ध पडली होती ती तब्बल पाच दिवसांनी शुद्धीवर आली असे सांगत ती व्यक्ती माझ्याकडे टक लावून पहात होती, मी पुढे काय झाले असे विचारले असता,तेव्हा ती व्यक्ती मोठ्याने हंबरडा फोडत ओरडली आणी म्हणाली सदरील अपघातात माझा मुलगा शुद्धीवरच नाही आला हो….. आणि ती कठाड्यात खाली बसली. हे ऐकूण माझ्या ह्दयात खड्डाच पडला, त्यांचा १८ वर्ष वयाचा तरणाभांड मुलगा या अपघातात मृत्यूमुखी पडला होता,
या अपघाताची दाहकता कशी होते व असते असा न्यायालयातला अनुभव सांगत न्यायाधीश संजय कुलकर्णी पुढे म्हणाले की, अनेक वर्ष वाहन चालविणाऱ्याचे अनुभव घेतले पाहीजे ! माझी चुक नव्हती मी माझ्या डाव्याबाजुनेच होतो मात्र समोरचाच घुसला किंवा डिव्हायडर मधून एखादे पशु – प्राणी अथवा वाहन आडवे आले. या पेक्षा समोरच्याची चुक असली तरी आपण सुरक्षीतपणे आपले वाहन चालविल्यास संभव्य घडणारे अपघात टाळूही शकतो असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना न्यायाधीश आर.बी.गीरी म्हणाले की,अपघातांमुळे मनुष्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्धस्त होते,अपघातात काहींना कायमचे अपंगत्व येते तर काहींना अवेळी मृत्यूला सामोरे जावे वेळ लागते, तेव्हा वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगत त्यांनी आरटीओ अधिकारी अनंता जोशी यांच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे कौतुकही केले.
यावेळी बोलतांना डीवायएसपी बसवराज शिवपुजे म्हणाले की, श्रीरामपूर हत्या (खुन) होण्याच्या प्रकारापेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही अधीक जास्त आहे, रस्ते अपघात कमी होण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असून मद्य प्राषान करुन अथवा कोणत्याही आमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालविल्यास अपघात हे अटळ असते तथा यावर कठोर कारवाई देखील केली जाते आहे असेही त्यांनी सांगीतले.
यावेळी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे म्हणाले की, ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह – मद्य प्राषान करुन वाहन चालविणाऱ्यांवर ३१ डिसेबरला जशी मोठी कारवाई केली जाते, याप्रमाणेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने अशी कारवाई सातत्याने वर्षभर सुरूच ठेवली पाहीजे, मद्य प्राषान करून वाहन चालविताना थरथर कापण्यापेक्षा पोलीस आणी आरटीओच्या कारवाईने असे वाहन चालक थरथर कापले गेले पाहीजेत तरच निरपराधांचे जीव वाचू शकतील यासोबतच,मित्र, भाऊ, काका, दादा,मामा, अशा नातेवाईकांकडून वाहन चालविण्याचे शिकण्याऐवजी अधिकृत वाहन चालक प्रशिक्षण केंद्र (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) कडूनच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यास वाहतूक नियमांची माहिती असलेले चांगले वाहन चालक निर्माण होतील असे सांगत श्री. आगे पुढे म्हणाले की, ऊसाच्या ओव्हरलोड वाहनांममुळे अनेक अपघात होतात,अशा प्रकारच्या नेहमीच अनेक नागरीकांच्या तक्रारी आहेत, यावर देखील उचीत कार्यवाही व कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी आरटीओ आणी पोलिस प्रशासनाकडे केली.
यावेळी कार्यकमाचे आयोजक श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे प्रमुख उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी बोलताना म्हणाले की,रस्ता सुरक्षा अभियान देशभर राबविले जात आहे, श्रीरामपूर आरटीओ कार्यक्षेत्रात वाहन चालकांसह जनसामान्य नागरीकांमध्ये रस्ते वाहतूक नियमांचे प्रसार व प्रचार व्हावेत,अपघात कमी व्हावेत, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत पुढे बोलताना ते म्हणाले की, वाहन चालवीतांना मोबाईलवर बोलणे, मद्य प्राषान करुन वाहन चालविणे,ओव्हरलोड वाहन चालवीणे हा कायद्याने गुन्हा असून,श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात अकोले, संगमनेर, कोपरगांव, राहाता,राहुरी, श्रीरामपूर, नेवासा अशा सातही तालुक्यात २०२४ मध्ये रस्ते अपघातात ४५४ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यात २४१ दुचाकी चालक तर १०६ चारचाकी चालक मृत्यूमुखी पडले असल्याचे त्यांनी सांगितले. करीता संभव्य अपघात टाळण्यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सिटबेस्ट चा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात हे नक्कीच कमी होतात, तेव्हा रस्ता सुरक्षा अभियानाचे माध्यमातून नागरीकांमध्ये वाहतूक नियमांचा प्रसार व पचार करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगून आरटीओ अधिकारी अनंता जोशी यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे सक्तीचे केले असल्याचे सांगीतले तसेच सदरील रस्ता सुरक्षा अभियान हे येत्या १ फ्रेब्रुवारी (महीनाभर) २०२५ पर्यत सुरु राहणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यकमाचे सुत्रसंचलन सहायक मोटार वाहन निरीक्षक धीरज भामरे यांनी केले.यावेळी जयबाबाचे कार्यकारी संपादक मनोज आगे, सार्वमत चे अशोक गाडेकर, राष्ट्र सह्याद्री चे करण नवले, दैनिक साईसंध्याचे शौकतभाई शेख,सीएससी सेंटर चे सरताज शेख यांसह मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, प्रविण सर्जेराव,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सचिन सानप, धीरज भामरे, पांडुरंग सांगळे, कुणाल वाघ, रोहित पवार, रोशन चव्हाण, अतुल गावडे, हेमंत निकुंभ, शितल तळपे, रोशनी डांगे, राणी सोनवणे,वरिष्ठ लिपिक मिलिंद पवार,अमोल मुंडे, हर्षल माळी, दर्शन सोनवणे, सुधाकर साळवे,आवटी, अभिजीत जाधव, त्रिमुखे. सुनील शिवरे.नागपुरे, प्रताप शिंदे, बाळासाहेब झेंडे, मनोज बोहोत,उमेश पवार, राजू ओमने, नवाब शेख, राजेंद्र काळे मामा विजय पाठक,अफजल मेमन तथा प्रमुख नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.