पूनर्वसित भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार:- दिग्विजय बागल
पूनर्वसित भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार:- दिग्विजय बागल
केतूर नं. -2 मध्ये उमेदवार दिग्विजय बागल यांची फटाक्यांच्या आतषबाजीत घोडयावरून मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १७/ मतदार जनता हीच माझी ताकद करमाळा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे असे वक्तव्य केतूर – 2 येथील सभेत बोलताना दिग्विजय बागल यांनी केले.
या सभेला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देत महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना विधानसभेच्या निवडणूकीत संपूर्ण सहकार्य करत विजयी करण्याची ग्वाही दिली. केतूर 2 सह पूनर्वसित भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे मार्गदर्शनाखाली महायुतीचे सरकार कटिबध्द आहोत. केतूरकरांनी दिलेल्या प्रेमादरामुळे मी भारावून गेलो आहे. या प्रेमाची उतराई होण्याची संधी विधानसभेत जाऊन या भागातील समस्या सोडवनार आहे. तरी आपण धनुष्यबाणाला मतदान करून मला निवडून द्या आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आपण व्हाल असे भावोद्गार उमेदवार दिग्विजय बागल यांनी काढले.
प्रचंड उत्साहाने संपन्न झालेल्या मिरवणूकीत व सभेस शेकडो मतदार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.