Breaking
ब्रेकिंग

वीज पडल्याने बैल जागीच ठार तर सालदार गंभीर जखमी*

वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात लिंबू बागा उध्वस्त*

0 3 9 0 8 1

*वीज पडल्याने बैल जागीच ठार तर सालदार गंभीर जखमी*

*वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात लिंबू बागा उध्वस्त*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- जळगाव जिल्हयातील अमळनेर तालुक्यातील खर्दे येथे पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडल्याने बैल जागीच ठार होऊन तीन गुरे गंभीर जखमी झाले आहेत. तर सालदार देखील गंभीर जखमी भाजला आहे. तर लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उध्वस्त झाल्या आहेत. खर्दे येथे संभाजी पाटील यांच्या शेतात कुट्टी करण्याचे काम सुरू होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने सालदार गाड्याखाली येऊन बसला. आणि पाच गुरे गाड्याला बांधून ठेवली होती. साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला. इतर गुरेही जखमी झाले. सालदार राहुल राजेंद्र बारेला देखील गंभीर भाजला असून त्याला सध्या डोळ्याला अंधारी येत आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातून नर्मदा फौंडेशन मध्ये आणण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , मुकेश साळुंखे यांनी भेट दिली.लोंढवे येथे वादळी वाऱ्यामुळे संजीव पाटील व सुमनबाई नामदेव यांच्या निंबू बागेची शंभरावर झाडे जमीनदोस्त झाली आहेत.12 मे रोजी लोंढवे गावात आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे शेतकरी संजीव नामदेव पाटील गट न ३१२ आणि सुमनबाई नामदेव पाटील गट न ३१५ यांच्या निंबू बागेचे १०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने फळबाग योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे