Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर करमाळ्याच्या लोकप्रतिनिधींना आली जाग; श्रेय मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन:- बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांचा घणाघात

0 3 9 0 4 8

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर करमाळ्याच्या लोकप्रतिनिधींना आली जाग; श्रेय मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन:- बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांचा घणाघात

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ सीना – कोळेगाव धरणातील पाणी कालव्याद्वारे साकत मध्यम प्रकल्पात सोडण्यात आल्यानंतर सिना कोळगाव धरण परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आणि बुधवारी (दि.१९) शेकडो शेतकऱ्यांनी धरण क्षेत्राजवळील परंडा ते सोनारी रोडवरील हरणवडा येथे रस्ता रोको व जल समाधी आंदोलन करत सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. या आंदोलनात करमाळा तालुक्यातील करंजे, दिलमेश्वर, बोरगाव या गावातील शेतकऱ्यांबरोबरच परांडा तालुक्यातील भोंजा, कुंभेजा, खानापूर, डोमगाव, सोनारी, कौडगाव, डोंजा, आलेश्वर, देऊळगाव या गाव व धरण परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांचे रौद्ररूप व आंदोलनाची तीव्रता पाहता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना लेखी पत्र दिल्यानंतर व प्रत्यक्षात साकत तलावासाठी सोडण्यात आलेले पाणी बंद केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले‌‌. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. असे असताना करमाळा तालुक्याचे आमदार यांनी मात्र आपण फोन करून सदर पाणी बंद करावयास भाग पाडले अशी हास्यास्पद प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हाला करमाळा तालुक्यातील लोकांबद्दल एवढा कळवळा होता तर मग 8 मार्चपासून सुरू असलेले पाणी बंद करण्यासाठी आपण 19 मार्च ची वाट का पाहिली असा सवाल करतानाच केवळ श्रेय घेण्यासाठी आमदार नारायण पाटील पुढे आले असून त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर जाग आली अशी टीका विनय ननवरे यांनी केली आहे.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, सदरील रस्ता रोको शेतकरी संघटना परांडा यांच्या वतीने करण्यात आले होते. माजी मंत्री व आमदार तानाजीराव सावंत यांच्या दबावाने अनधिकृतपणे साकत तळ्यात 11 दिवसापासून पाणी चालू होते. त्यावेळी करमाळ्याचे आपले लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसले. त्यांनी 11 दिवसात पाणी बंद करण्याविषयी एक शब्दही काढला नाही आणि आता श्रेय घेण्यासाठी पुढे आलेत. या रस्ता रोको साठी बोरगाव, दिलमेश्वर, करंजे येथून निलेश पाटील, जयसिंग घाडगे, केशव ढवळे, नाना भोगल, पप्पू ढवळे प्रहार संघटना या युवकांच्या पुढाकाराणे आम्ही सर्व गावकरी सहभागी झालो. जर लोकप्रतिनिधीनां करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची खरंच काळजी असेल तर येथून पुढे त्यांनी कोळगाव धरणातील पाण्याचा एक थेंबही अनाधिकृत पणे खाली जाऊन देऊ नये असे आवाहन विनय ननवरे यांनी लोकप्रतिनिधींना केले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे