भुयारी गटारीचे पाणी जातेय पिण्याच्या पाईपात ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अनेक महिन्यांपासून समस्येकडे दुर्लक्ष
भुयारी गटारीचे पाणी जातेय पिण्याच्या पाईपात ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अनेक महिन्यांपासून समस्येकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी :-पंकज पाटील
अमळनेर : येथील एलआयसी कॉलनी आणि संतसखाराम महाराज नगर भागात भुयारी गटारीचा पाईप लिक होऊन पाणी पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व असलेल्या खड्ड्यात जात असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे
धुळे रोड लगत संत सखाराम नगर खुल्या भूखंड परिसरात पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व असलेला खड्डा मातीचा आहे. तेथे व्हॉल्व्ह लिकेज आहे. तसेच त्याच्या बाजूलाच भुयारी गटारीची पाईप लाईन गेलेली असून तो पाईप लिक झाल्याने त्यातून घाण पाणी निघून ते पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व मध्ये जाते. व्हॉल्व्ह चा खड्डा काँक्रीट अथवा पक्के बांधकाम नसल्याने गटारीच्या सांडपाणी त्याठिकाणी जमा होते. तेच घाण पाणी पिण्याच्या पायीपमधून नागरिकांच्या घरात जात असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी नगरसेवक , पालिका यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे प्रचंड संताप झाला आहे.
गेल्या काही महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. तरीही पालिका कर्मचारी दखल घेत नाही. मुख्याधिकारिनी संबंधित कर्मचार्यांना दुरुस्तीच्या सूचना देऊनही दुरुस्ती होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने नागरिक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. तातडीने हा खड्डा दुरुस्त करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.