Breaking
ब्रेकिंग

शहर वाढले तर विकास होईल आपण केलेल्या विकासावरच मला मत द्या:- आमदार संजय मामा शिंदे

0 3 9 0 8 3

 

शहर वाढले तर विकास होईल आपण केलेल्या विकासावरच मला मत द्या:- आमदार संजय मामा शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १८/ करमाळा शहरातील ऐतिहासिक सुभाष चौकामध्ये आ. संजय मामा शिंदे यांची प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. गेल्या २०-३० वर्षापासून रखडलेले मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावले आहेत येत्या काही दिवसात त्याचा प्रत्यय आपणाला येईल त्यामुळे
तालुक्यातील गट तट जात पाहण्यापेक्षा आपण केलेल्या विकासावरच मला मत द्या असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी शहरातील ऐतिहासिक सुभाष चौकामध्ये प्रचाराची सांगता सभेमध्ये केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, नगरसेवक कन्हैयालाल देवी, शिवराज जगताप, मनसेचे संजय घोलप, नानासाहेब मोरे, बाळासाहेब गायकवाड, विजय पवार, अमोल लावंड, महादेव फंड, युवराज गपाट, प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अशपाक जमादार, नानासाहेब लोकरे, अण्णासाहेब पवार, जमीर सय्यद आझाद शेख, जगदीश अग्रवाल, नागेश कांबळे, राजेंद्र बारकुंड, विवेक येवले, सुजित बागल, रामचंद्र पवार, हनुमंत मांडरे, अफसर जाधव, विलास पाटील, अजित विघ्ने, नितीन झिंजाडे, तात्यासाहेब मस्कर, भोजराज सुरवसे, तात्यासाहेब सरडे, रितेश कटारिया इं. उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की शहर वाढले तरच विकास होणार आहे. जेव्हा आपण विरोधात होतो नऊ महिने सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस एकही रुपयाचे काम आले नाही. मी नेहमीच विकासाचा दृष्टिकोन घेऊन पुढे काम पाहिले आहे. २०१४ पासून विज सबस्टेशन वाढली नाहीत मात्र ठेकेदार मोठे झाले. तालुक्यातील 20 वर्षापासून रखडलेले प्रश्न आपण मार्गी लावले. रेटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत नुसती इथल्या लोकांनी भाषणे केली. त्याचा अभ्यास केला नाही. आपण कुकडीचा अभ्यास केला. दोन वर्षापासून यावर प्रयत्न केला. कुकडीच्या माध्यमातून तालुक्यातील शेती भिजत नाही हे लक्षात आले. कुकडीचे पाणी उजनीत टाकण्याचा मंत्रालयीन पातळीवर निर्णय केला. त्याचा आता सर्वे सुरू झाला आहे. ते भविष्यात शंभर टक्के मार्गी लागणार आहे. असे सांगून आपण 365 दिवस उद्घाटन होईल एवढे कामे केले आहेत. माझ्या लक्षातही नाही इतकी काम आपण केली आहेत कार्यकर्ते कामाची यादी वाचून दाखवतात. विकासाचे काम करणे यालाच माझे पहिले प्राधान आहे. तहसील ची अडचण आहे. जुन्या ठिकाणी आता पाय ठेवायलाही जागा नाही शहराची वाढ झाली पाहिजे त्यासाठी हा विकास आवश्यक आहे. येथे न्यायालयामध्ये सिनिअर डिव्हिजन ची गरज होती ती आपण मार्गी लावलेली आहे. त्याचे उद्घाटनही झाले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांच्या रुग्णालयाचे काम चालू आहे. शहरात पाणी येत नाही त्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये मोटारीला उपलब्ध करून दिले. शहराच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पाच दिवसात मार्गी लावली. मी विकासाच्या मुद्द्यावर मत मागतो जातीवर पुण्याई वर भावनेवर मत मागत नाही. या निवडणुकीतही कुठल्याही भावनेवर जातीवर मते देऊ नका. आपण विकासाला महत्त्व देतो. टक्केवारीसाठी आपण कधीही हात लावला नाही. चिकलठाण रस्त्याचे नवीन तंत्रज्ञानाने काम केले. सोळा दिवसात १६ किलोमीटर रस्ता केला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण सक्षम असल्याने पुन्हा आपल्याला संधी द्यावी असे आवाहन विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी विवेक येवले, चंद्रकांत सरडे, अण्णा पवार, कन्हैलाल देवी यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी संजय घोलप, गणेश चिवटे, ॲड. अजित विघ्ने, हर्षद बागल, सुहास गलांडे, विलास पाटील, रिपाईचे नागेश कांबळे यांनी यावेळी भाषणे केली. या सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सुजित बागल यांनी केले.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे