Breaking
ब्रेकिंग

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान….ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या – जीवन ज्योत फाऊंडेशन मागणी

0 7 6 9 4 3

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान….ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या – जीवन ज्योत फाऊंडेशन मागणी

नेवासा /  (तालुका प्रतिनिधी) : कमलेश नवले

तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली असून पिके आडवी पडली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर पिके सडली आहेत. ऊस, सोयाबीन, बाजरी, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र आज शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वाढते खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी कुटुंबांचे जगणेही कठीण झाले असून तातडीने दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे जीवन ज्योत फाऊंडेशनने सांगितले.

जीवन ज्योत फाऊंडेशन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून किमान ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी लागणारी खते, बियाणे, औषधे व इतर सवलती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.

संघटनेचे म्हणणे आहे की शासनाने केवळ पंचनामे करून वेळ घालवू नये, तर शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन उभारी द्यावी. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले नाहीत तर आगामी काळात शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी कमलेश नवले पाटील, प्रदेश अध्यक्ष नरेंद्र नवथर, अक्षय बोधक, अप्पासाहेब आरगडे, राहुल कांगुणे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे