केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पदवी व शिक्षणशास्त्र हि पदवी घेताना शाळेत रजा न टाकता पदवी धारण करणाऱ्या शिक्षकांची नावे पदोन्नत्ती यादीतून वगळून प्रशासकीय कारवाई करावी
केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पदवी व शिक्षणशास्त्र हि पदवी घेताना शाळेत रजा न टाकता पदवी धारण करणाऱ्या शिक्षकांची नावे पदोन्नत्ती यादीतून वगळून प्रशासकीय कारवाई करावी
राहुरी तालुका जावेद शेख
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आनंद भंडारी यांच्याकडे देवळाली प्रवरा येथिल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रप्रमुख पदोन्नती २०२४- २०२५ च्या प्रक्रियेतून ज्या प्राथमिक शिक्षकांनी केंद्रप्रमुख हि पदोन्नत्ती घेण्यासाठी शिक्षक पदवीधर किंवा शिक्षणशास्त्र हि पदवी प्राप्त केलेली आहे. शिक्षकांनी कोणतीही पदवी घेताना रजा टाकून शिक्षण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यालयातील ७५% उपस्थितीची अट असते.तरच परीक्षेला बसता येते. शिक्षक मात्र शाळेत हजर राहुन पदवी व शिक्षणशास्त्राचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.एकीकडे पगार घेयचा आणि दुसरीकडे नियमित शिक्षण घेतल्याचे दाखविले जाते. यावरुन शासनाची फसवणूक केली जात आहे.शाळेत रजा न टाकता नियमित (रेगुलर) पद्धतीने पदवीचा व बी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांची नावे केंद्रप्रमुख पदोन्नत्ती यादीतून वगळण्यात येवून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी उंडे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेने केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक
शिक्षकांनी नोकरी लागल्यानंतर पदवी पर्यंतचे शिक्षण व शिक्षणशास्त्राचा (बी.एड.) अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर बहिस्थ पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित असते किंवा रितसर रजा टाकून नियमित (रेगुलर) पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र जिल्ह्यातील अनेक पदवीधर शिक्षकांनी रजा न टाकता नियमित (रेगुलर) पद्धतीने पदवीचा तीन वर्षांचा व शिक्षणशास्त्र पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. नियमित (रेगुलर) पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करताना परीक्षेस पात्र होण्यासाठी ७५% उपस्थितीची अट असते. मात्र सबंधित शिक्षकांनी रजा न टाकता नियमित (रेगुलर ) पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. संबंधित शिक्षक एककाच वेळी कॉलेजला व स्वतःच्या शाळेत या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहू शकतात ? तसेच कॉलेज कडून शैक्षणिक फी मध्ये हि सवलत मिळवतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत असल्याने शासनाची फसवणूक केलेली आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी दि. २९ मे २०२५ रोजी सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. या यादीतील अनेक शिक्षकांनी कोणत्याही प्रकारची रजा न टाकता नियमित (रेगुलर) पद्धतीने पदवीचा तीन वर्षांचा व शिक्षणस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. अशा शिक्षकांच्या पदवीच्या गुणपत्रीकेवरील कॉलेज कोड तसेच पदवीच्या प्रमाणपत्रावरील कॉलेजच्या नावावरून संबंधित शिक्षकांनी सदर अभ्यासक्रम नियमित (रेगुलर) पद्धतीने केल्याचे सिद्ध होते. ज्या शिक्षकांनी पदवीचा अभ्यासक्रम बहिस्थपने पूर्ण केलेला आहे. त्यांच्या प्रमाणपत्रावर कॉलेजच्या नावा ऐवजी बहिस्थ विद्यार्थी असा उल्लेख असतो.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दि.
२९ मे २०२७ रोजी सेवाज्येष्ट पदवीधर शिक्षकांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीत पदवीधर शिक्षकांचे पदवीचे गुणपत्रक, पदवीचे प्रमाणपत्र, शिक्षणशास्त्र (बी.एड) चे गुणपत्रक व प्रमाणपत्र तसेच सेवापुस्तकातील दीर्घ मुदत रजेचा तपशील आदी बाबींची पडताळणी करावी.शिक्षणशास्त्र व पदवी घेण्यासाठी शिक्षकांनी कोणत्याही प्रकारची रजा न टाकता नियमित (रेगुलर ) पद्धतीने पदवीचा तीन वर्षांचा व शिक्षणशास्त्रचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. अशा पदवीधर शिक्षकांची
नावे सेवाज्येष्ट पदवीधर शिक्षकांची यादीतून वगळण्यात यावी.
ज्या शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाची फरावणूक केली आहे.त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागयांनी प्रसिद्ध केलेल्या यादीतील काही पदवीधर शिक्षकांणी कोणत्याही प्रकारची रजा न टाकता नियमितपणे पदवीचा व शिक्षणशास्त्र (बी. एड). चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे अशा शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्यास प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडाण्यात येईल असा इशारा उंडे यांनी दिला आहे.
■ शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला गटशिक्षणाधिकाऱ्यांचा ठेंगा ?
केंद्रप्रमुख पदोन्नती पदवी व शिक्षणशास्त्र पदवी रजा न टाकता पुर्ण करणाऱ्या शिक्षकांची नावे पडताळणी करुन तशा प्रकारचा अहवाल ११ जुलै पर्यंत सादर करण्याचे लेखी आदेश ३ जुलै रोजी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले होते.परंतू या आदेशाला एक महिणा पुर्ण होवून हि गटशिक्षणाधिकारी यांनी अद्यापही शिक्षकांची माहिती दिली नाही.या आदेशा बाबत दिरंगाई व हलगर्जीपणा होणार नाही.याची गांभिर्याने दक्षता घ्यावी असे आदेश दिले असतानाही गटशिक्षणाधिकारी यांनी मात्र या आदेशाला ठेंगा दाखवला आहे.शिक्षणाधिकारी यांनी आदेशाचे पालन केले नसल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करणार का?



