रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपल्याने शेतकरी, आंबा व्यावसायीक, वीटभट्टी मालक यांना तात्काळ नुकसान भरपाई जाहिर करा
महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपल्याने शेतकरी, आंबा व्यावसायीक, वीटभट्टी मालक यांना तात्काळ नुकसान भरपाई जाहिर करा
महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपल्याने शेतकरी, आंबा व्यावसायीक, वीटभट्टी मालक यांना तात्काळ नुकसान भरपाई जाहिर करा अशी मागणी महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. रायगड जिल्हयाच्या बहुसंख्य भागात अवकाळी पावसाने मे 2025 च्या सुरूवातीपासून जोरदार हजेरी लावल्याने जिल्हयातील विट भट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले असून बनवून ठेवलेल्या विटांवर पाण्याचे थेंब पडल्याने मोठया प्रमाणावर विटा खराब झाल्या असून त्या पुन्हा बनविण्याची वेळ व्यवसायिक यांच्यावर येणार आहे. तसेच भाजीपाला पीक घेणारे शेतकरी यांना देखील अवकाळी पिकाचा त्रास झाला असून त्यांचेही नुकसान झाले आहे आंबा पीकांच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाने फार नुकसान झाले आहे. पावसाने शेती आणि फळबागांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि फळबागायतदारांची चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतीमधील पीक खराब झाले आहे, तर काही ठिकाणी मळणीसाठी ठेवलेले पीक भिजल्याने नुकसान झाले आहे.संपूर्ण कोकणात आंबा आणि काजू यांसारख्या फळबागांवर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम होत आहे. ज्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावर परिणाम
अवकाळी पावसामुळे वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला आहे. हवामान ढगाळ झाल्याने आंबा आणि काजू फळ उत्पादन धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा, भाजीपाला, वीटभट्टी, मिठागरे आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसला आहे. रायगड जिल्हासह राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरीने बरसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हयात तसेच कोकणात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पूर्व विभागातील दुबार शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. मीठ व्यावसायीक, वीट व्यावसायिक यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तरी रायगड जिल्ह्याला अवकाळीने झोडपल्याने शेतकरी, आंबा व्यावसायीक, वीटभट्टी मालक, मीठ व्यावसायिक, दुबार शेती करणारे शेतकरी यांना झालेल्या नुकसानाबाबत आपण त्वरीत पंचनाम्याचे आदेश देवून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई जाहिर करणे बाबत आदेश दयावेत अशी विनंती. अॅड.ठाकूर यांनी केली आहे.