Breaking
ब्रेकिंग

न्यू लॉ कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर शिंगवे नाईक येथे उत्साहात संपन्न

0 4 3 3 7 3

न्यू लॉ कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर शिंगवे नाईक येथे उत्साहात संपन्न

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर राष्ट्रीय सेवा योजना भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेची विशेष हिवाळी शिबिर दिनांक ५/२/२०२५ ते ११/२/२०२५ या कालावधीत शिंगवे नाईक या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री दीपक रामचंद्र दरे सदस्य कार्यकारी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी आपल्या शुभहस्ते केले. माननीय श्री जयंत रामनाथ वाघ यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या शिबिर कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, डिजिटल लिटरसी, बालविवाह प्रतिबंध अभियान, प्लास्टिक मुक्त गाव, कायदेविषयक जनजागृती, महिलांचे कायदेविषयक हक्क, लिंगभाव संवेदनशीलता, आरोग्य शिबिर, एड्स जनजागृती, अवयव दान जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल येथील परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी, रामवाडी येथील अंगणवाडी, इस्लामपुरा, ग्रामपंचायत परिसर, गावातील रस्ते, धार्मिक स्थळे , गावातील दशक्रिया विधी ठिकाण या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक गोळा करून त्याचे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी, रामवाडी येथील अंगणवाडी, इस्लामपूर येथील हनुमान मंदिर, अंगणवाडी अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. माननीय जिजाबाई काळे सरपंच, गजेंद्र कोळपकर यांच्याही हस्ते काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. गावातील ग्रामस्थांना देखील रोप देऊन वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. बालविवाह प्रतिबंध , नव मतदार अभियान, अवयव दान जनजागृती यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या शिबिर कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे संपूर्ण सुरक्षा केंद्राचे नोयल सत्राराळकर, सागर फुलारी यांनी शिबिरार्थीच्या १४ आजारांवरील टेस्ट अगदी मोफत केल्या. तसेच पॉझिटिव स्पीकर यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. आणि शिबिरार्थींना आवाहन केले की एड्सग्रस्त रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार दिला तर त्यांना जीवन जगण्यास आधार मिळेल. या शिबिर कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर बी डी पांढरे यांनी मतदान एक कायदेशीर हक्क, प्रा. अतुल मस्के यांनी डिजिटल लिटरसी व सायबर क्राईम, प्रा. प्रियंका खुळे यांनी महिलांचे कायदेविषयक हक्क व लिंगभाव संवेदनशीलता, डॉ. अतुल मोरे यांनी भारताचे संविधान, प्राध्यापक सुनील जाधव यांनी योगा व युवक, डॉ.
विजय मस्के शारीरिक शिक्षण संचालक शारीरिक शिक्षण संचालक यांनी शिबिरार्थींकडून योगाचे प्रात्यक्षिके करून घेतली. श्री राजेश काळे यांनी देखील युवक व योगा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रसाद सायगावकर यांनी अवयव दान जनजागृती, डॉ. सतिश आहेर यांनी नेत्रदान जनजागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अवयव दान करण्यासाठी संकल्प करून घेतला.डॉ. सुहास पाखरे यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. विजयकुमार शिंदे यांनी ग्राहक संरक्षण कायदा, डॉ. एम.एम.तांबे यांनी श्रमाचे महत्त्व पटवून सांगितले.या शिबिर कालावधीत शिबिरार्थींनी ग्रामस्थांसोबत विविध विविध विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांसोबत सुसंवाद साधला. प्राचार्य डॉ. एम.एम.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले .

लॉ कॉलेजच्या या श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप करण्यात आला . “युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी ” या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ११ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शिंगवे नाईक या ठिकाणी झाला ,या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड विश्वासराव आठरे पाटील(सचिव, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर) हे होते त्यांनी असे संस्कार पूर्ण शिबिर झाले तर सक्षम तरुण पिढी घडेल असे मत व्यक्त केले
तसेच मुकेश माधवराव मुळे (विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ) यांनी या शिबिराने भविष्यातील वकिलांना कसा कसा फायदा होईल या दृष्टीने महाविद्यालयांनी प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले .

या शिबिराचे स्वागत प्राचार्य डॉ एम एम तांबे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एम तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणप्रेमी मा. विश्वास जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने आपले विचार मांडले. शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांनीही विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

७ दिवस चाललेल्या या शिबिरात मुलांनी गावात वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती केली तसेच गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले ,धार्मिक स्थळांची गावातील सर्व शाळांची स्वच्छता केली अवयव दान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केले अशा पद्धतीने सात दिवस हे शिबिर अतिशय उत्साह पूर्वक वातावरणात संपले या कार्यक्रमासाठी माननीय विश्वास जाधव, गोकुळ बोरुडे, व्यंकटेश जाधव, जावेद सय्यद ,चंद्रकांत काळे ,संतोष कोऱ्हाळे, सिताराम कोरडे, आप्पासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गिरीश हिरडे( कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गायत्री गुंड हिने केले तर आभार प्रा.अनुराधा मते (कारेक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना ) यांनी मांडले
स्वयंसेवक ऋषिकेश डमाळे आणि त्यांच्या टीमने अवयदान श्रेष्ठदान यावर पथनाट्य सादर केले उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कुमारी कोमल गवळी आणि मनीष पालवे त्याचा पुरस्कार देण्यात आला व यामध्ये नारायण पाखरे मामा यांचे विशेष सहकार्य लाभले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे