Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना ; रुपये किलो ने कोणी फळभाजी घेईना

0 4 3 3 7 3

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना ; रुपये किलो ने कोणी फळभाजी घेईना

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- मागील वीस वर्षापासून शेतकरी आत्महत्या हा विषय अत्यंत ज्वलनशील असून देखील लोकप्रतिनिधी मग ते लोकसभेतील असुद्या अथवा विधानसभेतील जिल्हा परिषदेतील असू दे अथवा पंचायत समितीतील कोणालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था उरलेली नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे शरद जोशी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आयुष्यभर शेतकऱ्यांच्या विविध उपक्रमांवर लिहिणारे दहिवद तालुका अमळनेर येथील चिमणराव पाटील यांनी शेतीप्रधान भारतीय देशाला शेतकरी हाच तारणहार आहे कारण जगभरातला मानव प्राणी शेतीमध्ये उत्पन्न झालेले अन्नच खाऊ शकतो मात्र तो शेतकरी उघडा नागडा आणि इतर भौतिक सुखाच्या छोट्या तर छोट्या गोष्टी उत्पादित करणारा उद्योगपती मात्र एशो आरामात जीवन जगणारा करोडपती होतो आणि ही तफावत सामान्यातल्या सामान्य माणसाला कळते मात्र शेतकऱ्यांच्या मतांमुळे विधानसभेत लोकसभेत पोहोचणारे लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दुर्लक्षित करतो शेतकरी देखील आपल्या होणाऱ्या शोषणाला समजून घेत नाही व वर्षानुवर्ष होणारे शोषण जणू काही अंगवळणी पडले
अशा पद्धतीने दरवर्षी फक्त आपली सहनशीलता वाढवीत आहे लहरी हवामानामुळे शेती परवडेनाशी झाली जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्याने ज्या शेतीमालाची देशात अधिक निर्मिती झाली त्या मालाला निर्यात करण्याचे धोरण मात्र सरकारे ठरवत नाहीत परंतु जो शेतीमाल कमी उत्पादित झाला त्याचा भाव वाढला तर मात्र इतर देशांमधून त्या शेतीमालाचे आयात करून भाव पाडण्यात सरकारीच पुढे आणि त्यामुळे आमचा शेतकरी हवालदिल झाला शेतकरी पुत्र थोडा शिकला म्हणजे शेतीकडे दुर्लक्ष करण्याचं परवाना मिळाला असं समजून इतर व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतो अर्थात अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षित पणे शेतीला समजून घेऊन जर शेती केली तर ती परवडेल देखील परंतु एकूणच दूरदृष्टीचा अभाव असल्याकारणाने आमचा शेतकरी शेकडो वर्षा नाडला जातोय आत्ताचीच उदाहरण मी आपल्यासमोर ठेवत आहे एका शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजींचे भाव पाहून प्रचंड मोठे भांडवल खर्च केले आणि औषधी मजुरी या साऱ्यांचा मेळ बसून हातामध्ये येणारा पैसा हा वजा अर्थात नुकसानीचा सौदा होणार होता म्हणून उद्विग्न होऊन चक्रीय फळभाजीच्या पिकावर अर्थात बाजारपेठेत नेण्याच्या वेळेसच छातीवर दगड ठेवून डोळ्यातल्या अश्रू रोखून धरून बायका मुलांची समजूत काढून मित्रांचा सल्ला नाकारून उभ्या फळ भाजीच्या पिकावर ट्रॅक्टरने रोटावेटर फिरवून आपलेच भविष्य पायदळी तुडविले याला शंभर टक्के कृषी विभाग कृषी मंत्रालय कृषी धोरण जबाबदार आहे मात्र एवढी भयंकर घटना घडून देखील बोथट झालेले समाजमन खडबडून जागे होईल ही शक्यता कमीच आहे तरी देखील हा माझा छोटासा प्रयत्न की या शेतकऱ्याने केलेले अत्यंत वेदनादायी कृत्य समाजापर्यंत घेऊन जाणे व समाजाला समाजभान यावे याकरिता हा प्रयत्न यासारखे अनेक विषय आहेत परंतु समाज सध्या माझं आणि फक्त माझं एवढंच पाहण्यात मग्न आहे स्वमग्न समाजाला इतरांची दुःख वेदना अडचणी समजतील तो सुदिन आणि तो भारतीय नागरिक आपल्यातला एक संदीप घोरपडे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे