Breaking
ब्रेकिंग

जयवंतराव जगताप यांनी घेतला हाती धनुष्यबाण,केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी दोस्ताना !!

0 4 0 4 2 6

जयवंतराव जगताप यांनी घेतला हाती धनुष्यबाण,केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी दोस्ताना !!

करमाळा  / विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी

करमाळा तालुक्यातील विकास,रखडलेले जनतेचे प्रश्न,गरजवंतांना आरोग्य सुविधा,तसेच शैक्षणिक व मजुरांना मदत अशा गोष्टी पुर्ण होवून तालुक्यातील जनता सुखी-समाधानी व्हावी या उद्दात हेतुने माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेशी दोस्ताना करत केला शिवसेनेत प्रवेश आणि उचलला हाती धनुष्यबाण!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी,माजी आमदार जयवंतराव जगतापांसोबत, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापु पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि श्री. शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे , शिवसेनेचे करमाळा – माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,सांगलीचे विठ्ठल पाटील ,सिंदखेडराजा जि.बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती
यांच्या उपस्थितीत शिवसनेत प्रवेश केला.
जगताप घराण्याचा राजकीय इतिहास पहाता,
तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासाची सुरूवातच करावयाची म्हटल्यास, जगताप गटाशिवाय त्याची सुरूवातच होऊ शकत नाही. तालुक्यातील आमदारकीचा इतिहास हा 1952 साला पासून ते आज 2024/25 पर्यंत झालेल्या निवडणुकी पैकी 60 वर्ष आमदारकी जगतापांसोबत असल्याचे पहावयास मिळते. तालुक्याचा संपूर्ण विकास त्यांच्याच मार्गदर्शन व नेतृत्वाखाली झाला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 1952 साला पासून ते आज 2024 पर्यंत झालेल्या निवडणुकीत माजी आमदार कै. रावसाहेब पाटील (1वेळा), माजी आमदार कै. दिगंबरराव बागल (2 वेळा), माजी आमदार शामलताई बागल (1 वेळा), आमदार नारायण पाटील शिवसेनेकडून (1 वेळा) असे सोडले, तर बाकी सर्व वर्ष आमदारकी म्हणजे तब्बल 35 वर्ष ही जगताप गटाकडे राहिलेली आहे असे दिसतेय.यामध्ये कै. नामदेवरावजी जगताप साहेब (4 वेळा म्हणजे 20 वर्ष), कै. आण्णासाहेब जगताप (1 वेळा म्हणजे 5 वर्ष), माजी आमदार जयवंतराव जगताप ( 2 वेळा म्हणजेच 10 वर्ष), माजी आमदार कै. तायप्पा सोनवणे, सुशीलकुमार शिंदे,कै.किसन कांबळे, माजी आमदार संजयमामा शिंदे आणि विद्यमान आमदार नारायण पाटील असे मिळून 60 वर्ष आमदारकी जगतापांसोबत असल्याची दिसत आहे. तर 25 वर्ष करमाळा नगरपरिषद जगताप गटाकडेच असल्याचे दिसत आहे. तर 30 वर्षापासून करमाळा बाजार समितीत सभापती म्हणून जयवंतराव जगताप हेच काम पहात आहेत.
जयवंतरावांचा निर्णय म्हणजे परिणामाचा विचार न करता, निर्णयावर ठाम राहणे असा असल्याचा आज पर्यंतचा त्यांचा इतिहास कायम आहे. मग कोणाला सहकार्य करण्याचा शब्द दिलेला असेल,कोणाशी दोस्ताना केलेला असेल,याला संपुर्ण तालुकाच काय जिल्हा साक्षीदार आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगताप यांच्य
शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.
…..चौकट…फोटो जयवंतराव जगताप
तालुक्याच्या हितासाठी मी हा निर्णय घेतलाय…..
..जयवंतराव जगताप
करमाळा तालुक्यातील जनतेच्या भावना व विचार यांचा मी अभ्यास करून,खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर विकासप्रीय नेतृत्वाकडे आपण गेले पाहिजे आणि हा गुण उपमख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे त्यांनी आजपर्यंत केलेला जनतेचा सर्वांगीण विकास पहाता,आपणही त्यांना साथ दिली पाहिजे असे ठाम मत माझे झाले. एकनाथराव शिंदे साहेब विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिंन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकविणार असल्याचा निर्धार माजी आमदार श्री जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करणरा
निर्णय….शिवाजीराव राखुंडे…संचालक कृ.उ.बा.
माजी आमदार श्री.जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली असणार यात शंकाच नाही. परंतु एकनाथराव शिंदे यांच्या शिवसनेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार शहाजी बापु पाटील यांच्या जोडीला जयवंतराव जगताप यांची मिळणारी साथ म्हणजे जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करणारी ठरणार यात शंकाच नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे