नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्र शेळावे चा लोकार्पण सोहळा संपन्न

नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्र शेळावे चा लोकार्पण सोहळा संपन्न
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : महावितरणच्या जळगाव परिमंडळाअंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास मुख्य अभियंता इब्राहीम ए. मुलाणी उपस्थित होते.३३६.७६ लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आ.अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले असून या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजवाटप व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह व कार्यक्षम झाली आहे.याशिवाय शेळावे व परिसरातील गावांसाठी हे उपकेंद्र एक महत्त्वाचा वीजपुरवठा केंद्रबिंदू ठरणार आहे.नियमित वीजपुरवठ्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीतील भारवाढ नियंत्रणात येणार असून दबावातील चढ-उताराचे प्रमाण कमी होणार आहे.वीजपुरवठ्यातील खंडित होण्याचे प्रमाण घटेल
,औद्योगिक, कृषी व घरेलू ग्राहकांना स्थिर वीज मिळणार आहे.यावेळी आमदार पाटील यांनी या उपकेंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना अखंडीत वीजपुरवठा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपकेंद्राच्या उद्घाटनानंतर शेळावे व परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्यात सातत्याने येणाऱ्या अडचणी व भारवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. महावितरणच्या वतीने या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : महावितरणच्या जळगाव परिमंडळाअंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास मुख्य अभियंता इब्राहीम ए. मुलाणी उपस्थित होते.३३६.७६ लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आ.अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले असून या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजवाटप व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह व कार्यक्षम झाली आहे.याशिवाय शेळावे व परिसरातील गावांसाठी हे उपकेंद्र एक महत्त्वाचा वीजपुरवठा केंद्रबिंदू ठरणार आहे.नियमित वीजपुरवठ्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीतील भारवाढ नियंत्रणात येणार असून दबावातील चढ-उताराचे प्रमाण कमी होणार आहे.वीजपुरवठ्यातील खंडित होण्याचे प्रमाण घटेल
,औद्योगिक, कृषी व घरेलू ग्राहकांना स्थिर वीज मिळणार आहे.यावेळी आमदार पाटील यांनी या उपकेंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना अखंडीत वीजपुरवठा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपकेंद्राच्या उद्घाटनानंतर शेळावे व परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्यात सातत्याने येणाऱ्या अडचणी व भारवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. महावितरणच्या वतीने या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.