Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार संजयमामांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे याची विरोधकांना पोटदुखी…

संजयमामांच्या पाठीशीच खरा जनाधार- ॲड. अजित विघने( प्रवक्ता शिंदे गट)

0 3 9 0 8 3

माजी आमदार संजयमामांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे याची विरोधकांना पोटदुखी…

संजयमामांच्या पाठीशीच खरा जनाधार- ॲड. अजित विघने( प्रवक्ता शिंदे गट)

करमाळा /  प्रतिनिधी

करमाळा विधानसभेत आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे गट पराभुत झाल्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते यांनी आज केलेली टिका विजयाच्या उन्मादाने हुरळुन केलेली असून, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट आता तालुक्यात भक्कम झाल्याचेच स्पष्ट होत आहे. एकट्या संजयमामांना रोखण्यासाठी तालुक्यातील मातब्बर असणाऱ्या मोहिते – पाटील,जगताप, बागल आणि पाटील गटाला एकत्र यावे लागले. परंतु ही अभद्र युती फार काळाची नसेल. आजपर्यंत झालेल्या निवडणुका पाहता मामांचे मतदान वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकात हार जीत असतेच,परंतु विधानसभेनंतर माझी करमाळा तालुका हीच कर्मभूमी कायम राहील हा ठाम निर्णय मामांनी स्पष्ट केल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखिल संजयमामांनी यापुर्वी चंद्रकांत सरडे यांना संधी दिली होती, केत्तुरचे राजेंद्रसिंह पाटील यांना दुध संघावर संधी दिली आहे. यापुर्वी विकासबापु गलांडे यांनाही मामांनी पदाची संधी दिलेली आहे.ॲड. राहुल सावंत यांना जिल्हा नियोजन समितीवर व अन्य कार्यकर्त्यांना विविध अशासकीय समित्यांवर मामांनीच पदे दिली आहेत.याशिवाय आजपर्यंत झालेल्या निवडणुकात कार्यकर्त्यांना बळ दिलेले आहे. भविष्यात देखिल होणाऱ्या निवडणुका शिंदे गट पुर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी फुकटचे सल्ले देण्याचे टाळून आता आदिनाथ कारखाना चालु करून शेतकरी सभासद व कामगारांना न्याय देण्याबाबत चिंतन करावे.
आदिनाथमधे निवडून आलेल्यांनी संगोबा येथे आदिनाथ महाराजांची घेतलेली शपथ लक्षात ठेवावी व कामकाज योग्य रित्या करावे. केवळ विषय दुसरीकडे वळवून मुख्य विषय बाजूला करण्याचे नेहमीचे तंत्र थांबवावे.आमचे नेते संजयमामा शिंदे हे सक्षम नेतृत्व असून भविष्यात नक्कीच पूर्ण ताकदीने करमाळ्याच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर राहतील याचा करमाळा तालुक्यातील जनतेला विश्वास आहे. तालुक्यातील अनेक युवक नेते मंडळी लवकरच संजयमामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.मामांच्या गटाची ताकद प्रत्येक निवडणुकीतून दिसुन येत आहे.
आदिनाथच्या निवडणुकीत देखिल जवळपास सात हजार मतांपर्यंत एकट्याने मजल मारली आहे. झालेल्या मतदानापैकी 41 टक्के मते संजय मामांना मिळाले आहेत तर 4 गट आणि त्यांच्यासोबत एकत्र आलेले उपगट यांना मिळून फक्त 48% मतं आहेत यावरूनच कोणाची ताकद किती आहे हे दिसून येते. त्यामुळेच निवडून येऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही.आता आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालवून दाखवावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे फुकटचे सल्ले देऊ नये असे आवाहान प्रवक्ते ॲड. अजित विघने यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे