Breaking
ब्रेकिंग

गाडगेबाबांनी स्वतः कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी सकाळीच शहरातून स्वच्छता फेरी काढून दिला स्वच्छतेचा संदेश

0 3 9 0 8 1

गाडगेबाबांनी स्वतः कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला

महाराष्ट्र शासनाने सुद्धा गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवून श्री संत गाडगेबाबांचे कार्य सुरू ठेवले- माध्यमिक उपशिक्षण अधिकारी आकाश दरेकर

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी सकाळीच शहरातून स्वच्छता फेरी काढून दिला स्वच्छतेचा संदेश

विशेष प्रतिनिधी : रफिक शेख 

नारायणडोहो : शहरातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे श्री संत गाडगे महाराज छात्रालय स्टेशन रोड अहिल्यानगर. या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली.फेरीची सुरुवात राष्ट्रीय पाठशाळा हायस्कुल मधून- माळीवाडा बस स्टॅन्ड- तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून – पुणे बस स्टॅन्ड वर आली. व त्या ठिकाणी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे बस स्टॅन्ड स्वच्छ केले. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांच्या संदेशाच्या घोषणा दिल्या गाडगेबाबाचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने परिसर दणाणून सोडला .नंतर स्वच्छता फेरी चाणक्य चौक महात्मा फुले चौक मार्गे पुन्हा वसतिगृहात आली .वसतिगृहात स्वच्छता फेरीचा समारोप झाला.या स्वच्छता फेरीच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी सुरेश ढवळे हे होते .कार्यक्रमाची सुरुवात गाडगे महाराजांच्या प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह अधिक्षक बाबासाहेब पातकळ यांनी केले.
अधीक्षक पातकळ यांनी आपल्या प्रास्तविकातुन संस्थेच्या सर्व वसतिगृहाला गाडगे बाबा यांचे नावे दिल्याचा इतिहास सांगुन काॅ.आबासाहेब काकडे यांनी गाडगे बाबांना आपले गुरु मानले होते.काॅ. आबासाहेब नंतर संस्थेचे प्रमुख अॅड विद्याधर काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी दिनदलित अनाथ निराधार गरीब गरजुवंताचे पालकत्त्व स्विकारुन समाज सेवेचे कार्य सुरु ठेवले आहे. याप्रसंगी वसतिगृहातील विद्यार्थी करण बारगजे,भागवत धलपे,या विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले .शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी गाडगेबाबांच्या जीवनाविषयी सखोल माहिती दिली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वच्छता अभियाना बाबत मार्गदर्शन केले. गाडगे बाबांनी स्वत: कृतीतुन स्वचतेचा संदेश दिला. महाराष्ट्र शासनाने सुद्धा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवून गाडगेबाबांचे कार्य पुढे सुरू ठेवले.भारत सरकारने सन २०१४ पासुन स्वच्छ भारत अभियान सुरु केले .विद्यार्थांनी खुप अभ्यास करून,क्रिडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या आईवडील व शिक्षकांचे नाव उज्वल करावे असे सांगितले. गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संस्थेचे प्रमुख अॅड विद्याधर काकडे व हर्षदाताई काकडे यांच्या संकल्पनेतून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना हिवाळा असल्याने खारीक-खोबरं – डिंक लाडू प्रत्येकी एक किलो प्रमाणे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाबासाहेब लोंढे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संजय सकट,कविराज बोटे,तुकाराम विघ्ने,राहुल लबडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे