Breaking
ब्रेकिंग

बरळण्यापेक्षा जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी:- ॲड. अजित विघ्ने*

0 3 9 0 8 3

*बरळण्यापेक्षा जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी:- ॲड. अजित विघ्ने*

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची दहीगाव सिंचन योजना मागिल पाच वर्षात माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सक्षमपणे चालवलेली आहे. याशिवाय या योजनेत वाढीव गावांचा समावेश करण्यासह या योजनेला सुधारीत मंजुरी मिळवुन कॅनाल अस्तरीकरणाची कामे याशिवाय, टेलला असणाऱ्या गावांना बंद नलिकेतून पाणी योजना मंजुर करून कामही प्रगतीपथावर होते. ज्यामुळे करमाळाच्या पुर्व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेतीला शाश्वत पाण्याचे नियोजन होणार होते. परंतु सत्ता मिळविण्यासाठी पाटील गटासह तालुक्यातील प्रमुख गटांनी साटेलोटे करून आपली दुकानदारी बंद होऊ नये म्हणुन तसेच जनतेची आणि कार्यकर्त्यांची दिशाभुल करून फक्त सक्षम नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना रोखण्यासाठी कुणी कुणी पॅच अप केले हे जनतेला माहीत आहे. विशेषतः एवढे पॅच अप करून सुद्धा माजी आमदार संजयमामा शिंदे गटाची ताकद वाढतेय हे निवडणुक निकालातून सिद्धच झाले आहे. निवडणुका हरल्या तरी शिंदे गटाची ताकद वाढली आहे हे विरोधकांच्या लक्षात आले आहे. त्यातच आता सत्तेमुळे पाटील गटावर जनतेची विकासकामे आणि आदिनाथ कारखाना चालवण्याची दुहेरी जबाबदारी पडलेली आहे. ही जबाबदारी पुर्ण करण्याऐवजी फक्त बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभुल करण्याचे काम पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर कायमच करत आहेत.

करमाळा तालुक्यात ज्यांना माजी आमदार संजयमामांचा तीन हजार कोटींचा विकास दिसत नव्हता तो आता दिसायला लागलेला आहे. याशिवाय निवडणुकी नंतरच्या पहिल्या अधिवेशनात तालुक्याकरीता दमडाही आणता आलेला नाही हे वास्तव आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला समान न्याय हक्काने शेतीला पाणी मिळाले पाहिजे. टेल पर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी मिळाले पाहीजे. या व्यतिरिक्त बंद नलिकेच्या कामाला नाहकपणे विपर्यास करून विरोध करणे, पाईप जाळणे, कंत्राटदारांना दहशत करणे या प्रकाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व समविचारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे मागणीचे निवेदन देऊन आज आंदोलन केले होते. आज सर्वत्र लग्नसराईमुळे भागातील लोक व्यस्त होते तरी देखिल आंदोलन यशस्वी झाले. करमाळा तालुक्यात सत्ता नसली तरी कर्मभुमी म्हणुन शिंदे गट कायम कार्यरत रहाणार असलेबाबत माजी आमदार संजयमामांनी विधानसभेच्या पराभवानंतरच आपली भुमिका स्पष्ट केलेली असुन शिंदे गटाच्या वाढत्या जनाधारामुळे घाबरलेल्या विरोधकांनी एकमेकांची डोकी फोडलेली विसरून भ्रष्ट मनोमिलन घडवुन आणलेले आहे. परंतु या भ्रष्ट युत्या अल्पावधीच्या असणार आहेत.

केवळ संजयमामांना रोखण्यासाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी पॅच अप करणारांनी आपआपली स्वतंत्र ताकद सिद्ध करावी. माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे पॅक अप होण्याची स्वप्ने आता कधीच पाहु नये. आगामी सर्व निवडणुका देखिल संजयमामा शिंदे गट पुर्ण ताकदीने लढवणार असुन, शिंदे गटाचा प्रत्येक कार्यकर्ता माजी आमदार संजयमामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन करमाळा मतदार संघातील जनसामान्यांसाठी कायम अग्रेसर राहणार आहेत. त्यामुळे प्रवक्ते तळेकरांनी काही तरी चुकीची वक्तव्ये करण्याचे टाळावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना मांडले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे