हाल्या आजारी अन् इंजेक्शन पकालीला,अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती असल्याने आमचा आदिनाथ निवडणूकतील पॅनल पुर्णपणे माघार घेत आहोत..
ज्यांचा विश्वास ज्या नेत्यावर त्यांच्या पाठीशी जनतेने उभा रहावे.... .....मा.आमदार जयवंतराव जगताप

हाल्या आजारी अन् इंजेक्शन पकालीला,अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती असल्याने आमचा आदिनाथ निवडणूकतील पॅनल पुर्णपणे माघार घेत आहोत..
ज्यांचा विश्वास ज्या नेत्यावर त्यांच्या पाठीशी जनतेने उभा रहावे…. …..मा.आमदार जयवंतराव जगताप
करमाळा / विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
आजारी असताना आपण सलाईन,इंजेक्शन घेवू शकतो पण मेल्यानंतर ट्रिटमेंट द्यायची म्हटल तर ती काय जिवंत होत नाही,मग आज कारखान्याची तशी आवस्था आहे,हाल्या आजारी अन् इंजेक्शन पकालीला अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती असल्याने मी माझ्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून आदिनाथच्या निवडणूकितुन पुर्णपणे माघार घेत आहोत. असे रोखठोक व स्पष्ट निर्णय जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जाहीर केला.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की,मी कोणाच्याही पाठीशी कोणाला जावा म्हणणार नाही,ज्यांचा विश्वास ज्या नेतृत्वावर आहे त्यांच्या पाठीशी जनतेने उभा राहवा,कोणतीही व कोणाचीही जबाबदारी मी घेणार नाही. असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. व ते म्हणाले,
ज्यावेळी युतीतुन पॅनल तयार होतो,आजपर्यंतच्या माझ्या राजकीय अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी ती संस्था निट चालत नाही. याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाहीत,दबावाचे राजकारण तिथ चालत आणि या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या माझ्याकडे आहेत. मला वैयक्तिक स्वतःच्या बहुमताने आणि स्वतःच्या विचाराने राजकारण करण्याची सवय आहे. काहींना ती पटलेली नसेल,पण बहुसंख्यांना ती पटलेली आहे. मि आदिनाथ कारख्यानाचा चेअरमन असताना नऊ संचालकांनी त्थावेळी राजीनामा दिला. का दिला ? हे सर्वांना माहीत आहे.
…..चौकट…1)
कारखाना उभा राहण्यामध्ये सर्वात जास्त योगदान आमचे गटाचे आहे. डि.सी. सी बॅकेतुन मी शेतकऱ्यांना 350 रू त्यांनी भरायचे आणि राहीलेले पैसे 2200/2300 रू ते बॅकेने द्यायचे,त्यावेळेस 5000/6000 शेअर्स गोळा करून भाग भांडवल उभे करून कारखाना उभा केला.त्यावेळी शरदचंद्र पवार यांनी माझी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1500 टन स्टील व 6000/_पोती सिमेंट साईटवर ठेवले. त्याच्यात सुद्धा राजकारण आणलं आणि तत्कालीन नगराध्यक्ष स्व.गिरधरदास देवी यांनी स्टे आणुन हायकोर्टातुन ते प्रशासक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर तत्कालीन खासदार अरविंद कांबळे यांची नेमणूक झाली. त्या काळापासून तो आजपर्यंत सुरू झालेला भ्रष्टाचार थांबला नाही….जयवंतराव जगताप
….चौकट ….2)
ज्यांच्या हातात20/25 वर्ष कारखाना दिला त्यांनी सुध्दा कधी लोकांचा,विश्वास संपादन केला नाही,उस ऊस उत्पादकांना,कर्मचाऱ्यांना, वाहनधारकांना न्याय दिला नाही.इथ फक्त कुरन आणि कमाई आहे,भ्रष्टाचार आणि राजकारण याच्याशिवाय आदिनाथची दुसरी ओळख नाही. पूर्वीच्या राजकारण्यांनी त्याची चांगली ओळखच होवू दिली नाही……जयवंतराव जगताप..
ज्यावेळेस पाटील-बागल यांची युती झाली ही युती घडविण्यासाठी सांगोल्याचे दिपक साळुंखे,माढ्याचे नेते संजय शिंदे यांनी ती युती घडवुन दिली. ती युती जास्त दिवस टिकली नाही. ती कशासाठी तुटली ते मी सांगत नाही.मधल्या काळात कारखाना बागलांच्या हातात होता. त्यावेळी रश्मी बागल यांनी शरद पवार यांना सांगितले की कारखाना चालवायला मी सक्षम नाही, तुम्ही चालवा ,आणि त्यावेळेस बारामती ॲग्रोला करार झाला,अनेक भानगडी झाल्या,कोर्टकचेरी झाल्या,वादविवाद झाले,बर्याच संघटना उठल्या,15 वर्षावरून 25 वर्षावर करार गेला,एन.सी.डि.सी.चे कर्ज अशा भानगडीत ते पेंडिंग पडले. त्यावेळेस मी पत्रकार परिषदे घेवून ब्रम्हदेव आला तरी पवारांशिवाय हा कारखाना कोणीच चालवु शकत नाही. आणि माझे हे भाकित खोट ठरलं नाही. हा कारखाना चालु करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले,तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पैशातून मदत केली. तरी कारखाना उस उत्पादक,कर्मचारी यांना म्हणावा तसा न्याय देवू शकला नाही. अशा सर्व गोष्टींचा मी बारकाईने विचार केल्यानंतर आमच्या सर्व सभासद सहकाऱ्यांना बोलुन विचारविनिमय केला व निवडणूकतुन माघार घेण्याचा निर्णय घेतला. असे शेवटी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले.