निसर्गाचे धन असलेल्या पशुपक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करावी: डॉ. उद्धव शिंदे
स्नेहबंधने केली पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था

निसर्गाचे धन असलेल्या पशुपक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करावी: डॉ. उद्धव शिंदे
स्नेहबंधने केली पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशुपक्षी नामशेष होत आहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशुपक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशुपक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने करावी, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
वाढत्या उन्हामुळे पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबवण्यासाठी स्नेहबंध फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. उन्ह्याळ्यात पक्ष्यांसाठी छावणी परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, नगर तालुका पोलीस स्टेशन, मूकबधिर शाळा-सावेडी, वडारवाडी झेडपी शाळा, यशवंतनगर झेडपी शाळा, जानकीबाई कवडे शाळा तसेच विविध सरकारी कार्यालये, शाळा, हॉस्पिटल व इतर सार्वजनिक ठिकाणी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, डॉ. गीतांजली पवार, शाळेचे संस्थापक मधुकर भावले, मुख्याध्यापक डी के जगधने, पो.राहुल द्वारके, पो.मोहिनी कर्डक, आडेप मॅडम, आडसरे मॅडम, चेमटे मॅडम आदी उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी. मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे डिजिटल झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळत आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.