सानेगुरुजी शाळेतील १९९४ च्या बॅच च्या ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात साजरा

सानेगुरुजी शाळेतील १९९४ च्या बॅच च्या ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात साजरा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर येथील सानेगुरुजी शाळेतील १९९४ च्या बॅच च्या ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिक्षकांच्या उपस्थितीत वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला.स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख होते. प्रवेशद्वारावरच मंगल वाद्यांनी शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. प्रार्थनेने स्नेहमेळाव्याला सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना आपला परिचय करून देत विचारांची देवाणघेवाण केली. शाळेत केलेला खोडकर पणा ,त्यानिमित्त मिळालेली शिक्षा , एकमेकांना चिडवणे या साऱ्या आठवणी जागृत केल्या. शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने सांगता झाली. पुन्हा एकदा शाळेचा आणि एकमेकांचा निरोप घेताना साऱ्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील ,सचिव संदीप घोरपडे , मुख्याध्यापिका अनिता बोरसे , मुख्याध्यापक सुनील पाटील ,विलास चौधरी , अनिल पाटील , विद्या पाटील , सावन महाजन आदी शिक्षक हजर होते.स्नेहमेळाव्यासाठी मनोज शिंगाणे , मुकुंदा पाटील , निलेश ठाकूर , विनोद थोरात , दीपक चव्हाण , आनन्द दुसाने , कोमल पाटील ,श्रीकांत पाटील , सीमा गाडगे , मोनिका चव्हाण , दीपाली बारी , वैशाली भदाणे , मनीषा कदम आदींचे सहकार्य लाभले.