क्रांतिपर्व स्मारकामुळे स्वातंत्र्य लढ्याची उजळणी
आमदार अनिल पाटील अमळनेर शहरात मान्यवरांच्या उपस्थितीत अखेर लोकार्पण सोहळा

क्रांतिपर्व स्मारकामुळे स्वातंत्र्य लढ्याची उजळणी
आमदार अनिल पाटील अमळनेर शहरात मान्यवरांच्या उपस्थितीत अखेर लोकार्पण सोहळा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :-अमळनेर येथील स्वातंत्र्याच्या लढयाची उजळणी करण्यासाठी क्रांतिवीर डॉ. उत्तमराव पाटील व क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांच्या स्मारकाची अमळनेरात आवश्यकता होती. त्यांचे धाडस, लढा, स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न काळाच्या पडद्याआड चालले होते. येत्या एक मे रोजी लीलाताई यांची पुष्यतिथी असल्याने हे स्मारक नगरसेवकांसह डांगरी ग्रामस्थ व जनतेच्या आग्रहाखातर लोकांसाठी खुले करण्यात आलेआहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केले.येथील पालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमधील क्रांतीपर्व स्मारकाच्या शुक्रवारी (ता.२५) झालेल्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, सुभाष चौधरी, जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, माजी नगरसेविका अॅड. चेतना पाटील, गायत्री पाटील, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, विवेक पाटील उपस्थित होते. सुरुवातीला पहेलगाम हल्ल्यातील अमळनेर कांतिपर्व स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी आमदार अनिल पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर आदी.
ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आमदार पाटील पुढे म्हणाले की, देशासाठी लढलेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, सैनिक
यांच्या समरणार्थ २७ एप्रिलपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर मंगल कलश नेणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मंगल कलश यात्रेचे नेतृत्व माझ्याकडे
असल्याने मुक्ताईनगर येथून सुरुवात होणार आहे. बोरी, तापी नदीचे जल व जेथे चिमठाण्याला डॉ. उत्तमराव पाटील यांचा खजिना लुटला होता. तेथील माती या कलशात न्यायची आहे. त्यादृष्टीने व एक मे रोजी लीलाताई पाटील यांची पुष्पतियों असल्याने या स्मारकाचे लोकार्पण करणे गरजेचे होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील, प्रा. सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील,संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, पराग पाटील, विनोद कदम, प्रा. मंदाकिनी भामरे, जे. के. पाटील, प्रताप शिंपी, नरेंद्र संदानशीव, राजेश पाटील, हिरालाल पाटील, दीपक पाटील, बी. एस. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.