गटविकास अधिकारी नगर यांच्या लेखी आश्वासनाने अक्षय आन्हाड यांचे उपोषण मागे…
लाभाच्या योजनांसाठी होत आहे अडवणूक
गटविकास अधिकारी नगर यांच्या लेखी आश्वासनाने अक्षय आन्हाड यांचे उपोषण मागे…
लाभाच्या योजनांसाठी होत आहे अडवणूक
एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी
नगर तालुक्यातील अनेक गावांत ग्रामसेवकांच्या कामकाजा विषयी तक्रार असतातच परंतु ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कामगार वर्ग असल्याने त्यांना वरिष्ठ कार्यालय अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेशी माहिती नसते त्यामुळें ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचारी असे मनमानी कारभार वाढत चालेला दिसत आहे. असाच प्रकार नगर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकी घोडके गेले १२ वर्ष पासून नेमणूक असल्याने सदर ग्रामसेवक नागरिकांना राजकीय पदाधिकारी सांगण्यावरून लाभाच्या योजना साठी अडवणूक केली जाते होती.अतिक्रमणाच्या नोटिस पाठवणे, (१)घरभाडे वसुली करणे,
(२) शासन निर्णय प्रमाणे मुख्यालयी न राहणे, (३) थम हजेरी मशीन न बसवणे, (४) शासन योजना पासून वंचित ठेवणे, (५) १२ वर्ष एकच ग्रामसेवक नेमणूकीस (६) कार्यालयात उपस्थित नसणे, (७) सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के दि.१०/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद समोर उपोषण काय कारवाई केली खुलासा करणे, विविध मुद्दे मागणी करून देखील आजतागायत कारवाई नाही या मागे आर्थिक तडजोड झाली का ईतर कोणत्याही कारणाने हि कारवाई झाली नाही.
शासन निर्णय प्रमाणे मुख्यालयी न राहणे, घरभाडे भत्ता लाभ घेणे, शासकीय वेळेत कार्यलयात नसणे अशा अनेक गंभीर बाबी सातत्याने घडत असल्याने शेवटी दहिगाव येथील अक्षय आन्हाड या युवकाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, पंचायत समितीचे नगर गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार पुरावे सादर करून शासन निर्णयानुसार दहिगाव ग्रामसेवक यांच्या वर कडक कारवाई साठी दि.३० डिसेंबर पासून उपोषण सुरु केले होते. सदर उपोषण पाठिंबा देण्यासाठी दहिगावतील अनेक जेष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी ८ वाजता गटविकास अधिकारी शरद मगर यांनी १५ जानेवारी २०२५ पर्यत घरभाडे बंद करून वसुली नोटिस, मुख्यालयी न राहणे बाबतीत, दहिगाव ग्रामपंचायत येथून बदली प्रस्ताव दोन दिवसांत दाखल करण्यात येईल, नागरिकांशी उध्दट भाषा वारंवार तक्रार आल्याने लेखी समज देऊन ती नोंद सेवा पुस्तकात घेतली जाई सर्व कारवाई च्या प्रती १५ जानेवारी उपोषण कर्त्याला त्या देण्यात येतील या सर्व मागणीचे पत्र गटविकास अधिकारी यांनी अक्षय आन्हाड या दिले .
या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के, माजी सरपंच सुनील म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे, पंचायत समिती अधिकारी कर्मचारी तसेच उपोषण स्थळी बंदोबस्त कामी कोतवाली पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी उपस्थित होते.