Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांवर नोटीसांचे बाण, माफियांना मात्र खुले रान

वन खात्याचा अजब कारभार. . .

0 3 9 0 2 8

शेतकऱ्यांवर नोटीसांचे बाण, माफियांना मात्र खुले रान

वन खात्याचा अजब कारभार. . .

अलिबाग /  प्रतिनिधी : राजेश बाष्टे

मिळकतखार येथील सरपंचासह दोन सदस्यांनी वन विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर माती व भराव माफीयांची जळफळाट झाली आहे. वन विभागाला हाताशी धरून आता शेतीच्या गरजेपुरता गुरांचे गोठे वन विभागात बांधल्याबाबत गरिब शेतक-यांना वन विभागाने नोटीसा पाठविल्या आहेत. या शेतक-यांनी आज अलिबाग येथे सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांची भेट घेतली. सावंत यांनी वन विभागाच्या अधिका-यांना दुरध्वनी करून शेतक-यांनी अतिक्रमण केले असेल तर ते तुम्ही नियमाप्रमाणे दुर करण्यास हरकत नाही परंतु त्याच वन जमिनीमध्ये गोरख कडवे, अभिजीत कडवेसह तिघांनी अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील वनविभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी सिमेंट विटांचे बांधकाम केल्याचा आरोप व तक्रार स्थानिक ग्रामस्थ जगदीश म्हात्रे यांनी केला आहे. त्यांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वन विभागतर्फे गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मग त्यांचे बांधकाम का पाडत नाही असा सवाल केले आहे. गोरख कडवे, अभिजीत कडवे यांनी वन अधिका-यांसमोर वन जनिमीवर केलेल्या अतिक्रमणाचा कबूलनामाच सावंत यांनी माध्यमांकडे प्रसिध्दीसाठी दिला आहे.

कारवाई करावयची असेल तर सर्वांवर करा, एक दोन शेतक-यांना राजकीय दबावाखाली टार्गेट करू नका असा सज्जड इशारा सावंत यांनी संबधीत वन अधिका-यास दिला आहे. मिळकतखार येथे वन विभागाच्या स.नं. 186/अ, ग.नं. 537 या जागेत बेकायदेषीररित्या होडया बनविणे, मोठ मोठे ढाबा, हॉटेल चायनीस दुकाने, सलुन दुकाने आहेत. या अनधिकृत दुकानांना विदयुत पुरवठा करू नये व केला असल्यास सदर विदयुत पुरवठा त्वरीत तोडून टाकावा म्हणून परिक्षेत्र वन अधिकारी, कनकेश्वर यांनी कनिष्ठ अभियंता, महाराश्ट् विदयुत मंडळ, मांडवा यांना दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी पत्र दिले आहे. सावंत यांनी या बाबत कनिष्ठ अभियंता, महाराश्ट् विदयुत मंडळ, रेवस यांच्याकडे चौकषी केली असता त्या दिड वर्शापूर्वीच हजर झाल्या असून याबाबत माहिती घेवून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सावंत यांना दिले आहे.

दरम्यान परिक्षेत्र वन अधिकारी, अलिबाग यांचे कार्यालय-अलिबाग यांनी मौजे निळकतखार येथील वन विभागाच्या जमिनीवर अंबर पंढरीनाथ नाखवा, गौरख दशरथ कडवे, वसंत काशिनाथ पाटील, जयंत शांताराम कडवे, आकाश बाळाराम कडवे, अभिजीत अजित कडवे, अर्जुन गणपत्त ठोंबरे, रोहिदास हरिश्चद्र कडवे, सरिता रामनाथ कडवे, कृष्णा काशिनाथ पाटील, अमृता अरविंद ठोंबरे, रमाकांत मोतीराम कडवे, गणपत दत्तु ठोंबरे, स्वप्नील अशोक कड़वे, ग्रामपंचायत मिळकतखार, वैष्णवी वसंत पाटील, सुरज गणेश म्हात्रे, मधुकर एकनाथ म्हात्रे, मधुकर एकनाथ म्हात्रे, स्वप्नील अशोक कडवे, गोरख दशरथ कड़वे, आत्माराम नारायण कोळी, अजिंक्य दिलीप ठोंबरे व उमेश दशरथ ठोंबरे यांनी वन विभागाच्या जागेत अतिक्रमण केले असून त्यांच्यावर वन विभागातमर्फे गुन्हे दाखल आहेत. अतिक्रमणाच्या गुन्हे कामी महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966चे कलम 53,54 अन्वये कार्यवाही पुर्ण करणचे आदेश वनपाल कनकेष्वर यांना दिले असून या कामी पाठपुरावा करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल परिक्षेत्र वन अधिकारी, अलिबाग या कार्यालयास सादर करावा असे आदेषीत केले आहेत. एकूण 24 अतिक्रमणे वन जमिनीवर झाली असताना वन विभाग गुरांचे गोठे बांधलेल्या दोनच गरिब शेतक-यांविरूध्द नोटीसा बजावते आणि बेकायदेषीररित्या होडया बनविणे, मोठ मोठे ढाबा, हॉटेल चायनीस दुकाने, सलुन दुकाने वनजमिनी थाटणा-या बडया धेंडांना मोकळे सोडते याबद्दल सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे